vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे 21 ते 23 मार्च कालावधीत सातारा येथे आयोजन

पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे 21 ते 23 मार्च कालावधीत सातारा येथे आयोजन

सातारा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालवधीत अलंकार हॉल, पोलिस करमणुक केंद्र, सातारा येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करणेत आलेले आहे. याचा सातारा शहर वासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

पौष्टीक तृणधान्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास मधुमेह, बध्दकोष्ठता, आतड्याच्या आजारास प्रतिबंध होतो. तसेच तृणधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह, ह्यदयविकार, अॅनिमिया, उच्च रक्तदाब रोधक मानले जातात. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

पौष्टिक तृणधान्य महोत्सवामध्ये माण, खंडाळा येथील देशी बाजरी, सातारा, खटावची देशी ज्वारी ,कराडची नाचणी, जावळी, पाटण चा देशी इंद्रायणी तांदुळ, खटावचा हिरवा मुग, कोरेगाव चा जीआय मानांकन प्राप्त वाघ्या घेवडा, वाई तालुक्यातील हळद तसेच फळांचे गाव धुमाळवाडी येथील विविध प्रकारची दर्जेदार फळे तसेच पोष्टिक तृणधान्यांपासुन तयार केलेल प्रक्रिया पदार्थ इ. वैशिष्ट्य पुर्ण व दर्जेदार उत्पादने शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. थेट शेतक-यांच्या शेतातून ताजे व स्वच्छ अन्नधान्य खरेदीची संधी सातारकरांना मिळणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

सायन सर्कल येथे भीषण अपघात – सिमेंट मिक्सरची गाडी पलटी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सिकलसेलमुक्त करण्यासाठी मिशन मोड काम करण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

परंपरागत शेतीवर अवलंबून राहू नका, शेतमालावर प्रकिया काळाची गरज- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – उत्पादक खरेदीदार संमेलनात प्रतिपादन, संमेलनास शेतकरी, निर्यातदारांचा उत्स्फूर्त सहभाग- 48 शेतकरी गटांचे स्टॉल, 45 निर्यातदार / खरेदीदारांचा सहभाग- ⁠14.39 कोटींच्या 1580 मेट्रीक टन मालाच्या खरेदी विक्रीबाबत करार ..

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार- उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे,मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या अभियानांतर्गत श्रमदान

vishwatmaklokswamivarta

भाषिक भेदभावाची भूमिका संविधानविरोधी असून परप्रांतीयांवर दादागिरी करणे योग्य नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

अलिबाग तालुक्यातील सरपंच पदे आरक्षण सोडत दि.15 जुलै रोजी