vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्ह्यातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम, २००९ नुसार, यंदाही २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. आज, दि. २८ एप्रिल, २०२५ रोजी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक ३ मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया दि. २८ एप्रिल २०२५ ते दि. ७ मे २०२५ या कालावधीत पूर्ण करायची आहे.

    निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती SMS द्वारे पाठवली जात आहे. मात्र पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती नियमितरित्या तपासावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे     प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन दस्तऐवजांची तपासणी करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी दि. ७ मे २०२५ पर्यंत पूर्ण करावी लागेल.   ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती आणि महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ६२७ पात्र शाळांमध्ये ११,३२० रिक्त जागा उपलब्ध होत्या. आतापर्यंत ८,३५८ प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रतीक्षा यादी टप्पा ३ अंतर्गत उर्वरित रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

00000

संबंधित पोस्ट

रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत सन्मान व समारोप समारंभ संपन्न

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

vishwatmaklokswamivarta

ऑनलाईन मालमत्ता करभरणा प्रणालीला उत्साही प्रतिसाद देत करदात्या नागरिकांमध्ये 15 टक्के वाढ लवकरच अद्ययावत ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’चाही कर भरण्यासाठी होतोय समावेश..

आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२५ अंकाचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta

मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प,मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…

vishwatmaklokswamivarta

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अपमानाविरोधात सर्वहारा समाजाचा ‘महामोर्चा’