vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन

आरटीई प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा ३ प्रवेश फेरी सुरू शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना महत्त्वाचे आवाहन

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्ह्यातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम, २००९ नुसार, यंदाही २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. आज, दि. २८ एप्रिल, २०२५ रोजी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक ३ मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया दि. २८ एप्रिल २०२५ ते दि. ७ मे २०२५ या कालावधीत पूर्ण करायची आहे.

    निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी आवश्यक असलेली माहिती SMS द्वारे पाठवली जात आहे. मात्र पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती नियमितरित्या तपासावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे     प्रतीक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन दस्तऐवजांची तपासणी करून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची पडताळणी दि. ७ मे २०२५ पर्यंत पूर्ण करावी लागेल.   ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती आणि महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ६२७ पात्र शाळांमध्ये ११,३२० रिक्त जागा उपलब्ध होत्या. आतापर्यंत ८,३५८ प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रतीक्षा यादी टप्पा ३ अंतर्गत उर्वरित रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

00000

संबंधित पोस्ट

पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन

दप्तर हलके करण्याच्या नावाखाली शिक्षण विभागाने केल्या कोटींच्या चुका !पुस्तकात वह्यांची पाने घालण्याच्या प्रयोगात शासनाचे१३५ कोटी वाया; सुराज्य अभियानाकडून चौकशीची मागणी…

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्यासाठी विनामुल्य एसएसबी प्रशिक्षण.

मुंबई – पुणे एक्सप्रेसवे वरील वाहतूक सुरळीत सुरू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होऊ देणार नाही- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

चित्तोडा ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपसरपंच-सदस्यांचा राजीनामा…