vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

थ्री आर’ संकल्पनेंतर्गत इयत्ता नववी, दहावीचे सुस्थितीतील पाठ्यपुस्तक संच आदिवासी आश्रमशाळेला भेट

‘थ्री आर’ संकल्पनेंतर्गत इयत्ता नववी, दहावीचे सुस्थितीतील पाठ्यपुस्तक संच आदिवासी आश्रमशाळेला भेट

 

     नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधील इ.नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके संकलित करून त्याचे पुस्तक संच रयत शिक्षण संस्थेच्या आदिवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकरिता पाठविण्याचा पर्यावरणशील अभिनव उपक्रम प्रभात ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात राबविण्यात आला.

  महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते मोखाडा आश्रम शाळेचे प्रतिनिधी श्री.दीपक काशीकर यांच्याकडे प्रभात ट्रस्ट संस्थेचे प्रमुख डॉ.प्रशांत थोरात यांच्या उपस्थितीत हे पुस्तक संच देण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, परिमंडळ 1 उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, मुख्य विधी अधिकारी श्री.अभय जाधव व इतर अधिकारी उपस्थित होते.

   जागतिक पर्यावरण दिनाला साजेसा हा अभिनव उपक्रम ‘थ्री आर’ अर्थात कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर (Reuse) आणि कच-यावर पुनर्प्रक्रिया (Recycle) या पर्यावरणपूरक संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये वापरलेली पुस्तके पुन्हा वापरात आणून सुविधांचा अभाव असणा-या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी प्रेरणा मिळणार आहे. या सोबतच जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर होत असल्याने कागदी कचरा कमी होणार आहे.

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतून इ. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी वापरलेल्या सुस्थितीतील पुस्तकांचे 1 हजारहून अधिक संच संकलित करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 100 संच देण्यात आले आहेत. आणखी एक विशेष बाब म्हणजे प्रभात ट्रस्टच्या माध्यमातून ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन यावर्षी राबविण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत 11 कचरा वेचक महिला दहावीची शालान्त बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असून त्यांनी याच पुस्तक संचाचा उपयोग केलेला आहे.

     एक वर्षभर अभ्यासासाठी वापरलेली जुनी पाठ्यपुस्तके उत्तीर्ण होऊन पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर टाकून न देता त्याचा उपयोग इतरांना अभ्यासासाठी होऊ शकतो ही संकल्पनाच सामाजिक भावना जपणारी असून नवी मुंबईकर पालकांनी याचा विचार करून आपल्या पाल्यांसाठी या संकल्पनेचा उपयोग करावा आणि ‘थ्री आर’ चा अंगिकार करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यावेळी केले

0000

संबंधित पोस्ट

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

📚✨ जालना मनपा शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; रेडक्रॉस सोसायटी होणार सामाजिक सेवेचा वटवृक्ष – डॉ. किरण पाटील 

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न,खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी  –जिल्हाधिकारी किशन जावळे

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात-भाजपाचा संवाद मेळावा; सर्वांनी उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे