vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र अनिवार्य;लाभार्थ्यांसाठी 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र अनिवार्य;लाभार्थ्यांसाठी 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

      अमरावती, प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अर्थात हयात प्रमाणपत्र (डिएलसी) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अमरावती तहसील कार्यालयाने 18 ते 31 ऑगस्ट या कालावधीत विशेष शिबिर आयोजित केले आहे. सर्व लाभार्थ्यांना विना विलंब हयात प्रमाणपत्र काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

     शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक लाभार्थ्याने बेनिफीशरी सत्यापन ॲपच्या माध्यमातून हयात डिजीटल लाईफ सर्टिफीकेट (डिएलसी) काढून आपण हयात असल्याचे प्रमाणित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र सादर केल्यास संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचा शासकीय लाभ सुरु राहील. या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी अमरावती शहर संजय गांधी तहसील कार्यालयामार्फत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्व लाभार्थ्यांनी विना विलंब हे प्रमाणपत्र काढावे असे तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

     लाभार्थी मोबाईलवर संबंधित अ‍ॅप डाउनलोड करून स्वतः डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करू शकतात किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट काढून घेऊ शकतात तसेच तहसील कार्यालयातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

बुलढाण्यात “रन फॉर फॉरेस्ट” मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश 600 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग ..

ऐरोली विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या मॅपिंगसाठी विशेष मोहीम; २००२ च्या मतदार यादीशी होणार पडताळणी*

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची राज्यात यशस्वी वाटचाल

महास्ट्राईड अंतर्गत प्रोत्साहनात्मक निधीसाठी गुणवत्तापूर्ण कृती आराखडे तयार करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**कामगिरीआधारित निधी मिळविण्यावर भर; शासन निर्णयाचा अभ्यास करून नियोजन करण्याच्या सूचना*

भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष देत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचा आदेश,सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या भटक्या श्वानांना तात्काळ हटवून त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर येथे #आषाढीएकादशी निमित्त ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण..