vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

कॉंग्रेस, मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण पुढे नेत आहे, जनतेनं या तुष्टीकरणाच्या राजकारणा विरोधात एकजूट व्हावं असं केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा

कॉंग्रेस, मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण पुढे नेत आहे, जनतेनं या तुष्टीकरणाच्या राजकारणा विरोधात एकजूट व्हावं असं केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली प्रतिनिधी-

कॉंग्रेस, मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण पुढे नेत आहे, जनतेनं या तुष्टीकरणाच्या राजकारणा विरोधात एकजूट व्हावं असं केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीनं वंदे मातरम्‌ बाबत घेतलेल्या निर्णयावर त्यांनी कडाडून टीका केली.

काँग्रेसनं १९३७ मध्ये वंदे मातरम्‌च्या केवळ दोन कडव्यांचं गायन करण्याचा निर्णय घेतला होता. मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणासाठी वंदे मातरम्‌चे दोन तुकडे करण्यात आले. यामुळेच देशाच्या फाळणीचा पाया रचला गेला असा दावा त्यांनी केला. हाच निर्णय आता पुन्हा पुढे नेला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसच्या या भूमिकेमुळे वंदे मातरम्‌ या गीताचा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो देशवासीयांचा अपमान झाला आहे, असंही शहा म्हणाले. नरेंद्र मोदी सरकारनं वंदे मातरम्‌बाबतचा काँग्रेसचा जुना निर्णय दुरुस्त करून राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी त्याला कायदेशीर आधार दिला आहे, असं ते म्हणाले. काँग्रेस, संसदेनं केलेल्या कायद्याला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोध करतेय असा आरोप त्यांनी केला.

संबंधित पोस्ट

दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील प्रमुख देवस्थानांची सुरक्षा वाढवली…

vishwatmaklokswamivarta

लघु उद्योजकांनी “जिल्हा पुरस्कार 2024-25” करितादि.10 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत…

अनंत चतुर्दशी दिनी होणा-या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे*भारताचा वेग आणि विकास अधोरेखित- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी आणि विकसित भारताच्या दिशेने मजबूत पाऊल…

शासनाचे कौशल्य विकास उपक्रम समाजाभिमुख व्हावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणांना मुंबईत ‘बालस्नेही पुरस्कार २०२४’ देऊन सन्मानित