vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 

बुलडाणा, प्रतिनिधी: माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत 166 केंद्रावर होणार आहे. ही परीक्षा शांत व सुरक्षित वातावरणात पार पाडावी यासाठी सर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी दिले आहेत.

यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटल्यानुसार परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहीता-2023 चे कलम 163 अन्वये जिल्हयामधील 116 केंद्रावर दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 रोजी सकाळी 6 ते सायं 8 वाजेपर्यंत परिक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून असलेल्या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करीत आहे.

अटी व शर्ती : परिक्षा केंद्राचे परिसरामध्ये प्रवेश करतेवेळी 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीतरीत्या प्रवेश करणार नाहीत तसेच कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणेबाबत मज्जाव करण्यात येत आहे. परिक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाही. परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मधीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी बुध ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परिक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात यावेत. परिक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट,मोबाईल फोन,सेल्युलर फोन,ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई राहील.परिक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. परिक्षा केंद्रावरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परिक्षार्थी तसेच परिक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सदर प्रतिबंधात्मक आदेश परिक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश

व्याघ्र संवर्धनात नागरिकांच्या व्यापकसहभागासाठी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस… जागतिक व्याघ्र दिनानिमित्त ‘वाईल्ड ताडोबा’ माहितीपटाच्या ट्रेलरचे आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या पुरस्काराचे वितरण

रखरखत्या उन्हाळ्यात हिरवाईने नटलेले शुभ वर्तमान-अरण्यम प्रकल्प;कातपूर येथे ४.२५ हेक्टरवर १ लाख २७ हजार रोपांची घनवन लागवड..

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

गुणवत्ता आणि मुदतीबाबत तडजोड खपवून घेणार नाही*प्रलंबित रस्ते कामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम यंत्रणांना कडक इशारा …

vishwatmaklokswamivarta