vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या !  कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य 

शेतकऱ्यांनो फार्मर आयडी बनवला नसेल तर लगेच बनवून घ्या !  कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य

 

         बुलढाणा, प्रतिनिधी: केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी 15 एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घेतले नाही त्यांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करुन शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी बनवून कृषी योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

फार्मर आयडी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषि व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) तयार करण्यात येणार असून उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ वितरीत करणे सुलभ होईल. तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही. शेतकरी ओळख पत्र क्रमांक 15 एप्रिल 2025 अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचे शासननिर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी सातबारा आधारला लिंक करायचा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 47 हजार 213 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी तयार करुन वितरीत करण्यात आले आहे.

आयडी बनवण्यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक जो आधार व बँक खात्याशी लिंक व सातबारा किंवा नमुना 8 या कागदपत्राची आवश्यक आहे. ही कागदपत्रे घेवून आपल्या जवळच्या नागरी सुविधा केंद्र (सीएससी), ग्राम कृषि विकास समिती येथे नोंदणी करावी. फार्मर आयडी बनवला नाही तर कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतकरी ओळख क्रमांक बनवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

टी-२० विश्वचषक फायनल: १०,००० कोटींच्या सट्टेबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ! – सुराज्य अभियानाचे नागपूर व गोवा येथील तक्रारींना समर्थन*

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

उमेद मार्टचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

सामाजिक न्याय विभागाचा आज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

दरडोई उत्पन्न वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा – खासदार नारायण राणे

vishwatmaklokswamivarta

दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर

vishwatmaklokswamivarta