vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शहापूर व धाकलगाव येथे जलद एस.टी. बसेसना अधिकृत थांबा द्या ; एस.टी.महामंडळाकडे प्रवाशांची मागणी-विद्यार्थी,महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय ; खासगी वाहतुकीमुळे आर्थिक भुर्दंड

शहापूर व धाकलगाव येथे जलद एस.टी. बसेसना अधिकृत थांबा द्या ; एस.टी.महामंडळाकडे प्रवाशांची मागणी-विद्यार्थी,महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय ; खासगी वाहतुकीमुळे आर्थिक भुर्दंड

 

 राज्य प्रतिनिधी-अंबड तालुक्यातील शहापूर आणि धाकलगाव येथे जालना व बीडकडे जाणाऱ्या सर्व जलद एस.टी.बसेसना अधिकृत थांबा मंजूर करण्यात यावा,अशी आग्रही मागणी परिसरातील शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान,ग्रामस्थ व प्रवाशांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (एस.टी.)निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या संदर्भातील लेखी निवेदन जालना विभागाचे विभाग नियंत्रक सुरेश टकले तसेच जिल्हाधिकारी कार्यालय,जालना येथे सादर करण्यात आले आहे.

विद्यार्थी व प्रवाशांचे अतोनात हाल

अंबड तालुक्यातील शहापूर व धाकलगाव ही अत्यंत महत्त्वाची गावे असून या गावांशी लगतच्या अनेक खेड्यांचा दैनंदिन संपर्क आहे.शहापूर येथे दाढेगाव,रेवलगाव,बारसवाडा,मठ तांडा तर धाकलगाव येथे शोभानगर,पिठोरी शिरसगाव,नवीन पिठोरी शिरसगाव यांसह पंचक्रोशीतील हजारो नागरिक,विद्यार्थी,शेतकरी,कामगार,महिला व ज्येष्ठ नागरिक शिक्षण,रोजगार,आरोग्यसेवा आणि प्रशासकीय कामकाजासाठी जालना,अंबड,गेवराई व बीड येथे दररोज प्रवास करतात.

मात्र,या दोन्ही महत्त्वाच्या गावांमध्ये जलद बसेस थांबत नसल्यामुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.नाईलाजास्तव नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून यामुळे वेळेचा अपव्यय आणि मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.विशेषतः शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून महिला व ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे केल्या आहेत.शहापूर येथे जालना आणि बीडकडे जाणाऱ्या सर्व योग्य जलद एस.टी.बसेसना अधिकृत थांबा तातडीने मंजूर करण्यात यावा.धाकलगाव येथेही दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या जलद बसेसना अधिकृत थांबा देण्यात यावा. प्रत्यक्ष प्रवासी व विद्यार्थ्यांची संख्या तसेच स्थानिक गरजेचा आढावा घेण्यासाठी महामंडळाने तातडीने स्थळ पाहणी व सर्वेक्षण अहवाल तयार करावा.प्रवासी सोयीनुसार बसेसचे वेळापत्रक व थांबे निश्चित करण्यात यावेत.प्रशासनाने यावर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करून केलेल्या उपाययोजनांची लेखी माहिती द्यावी.

भारतीय राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वानुसार ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित,सुलभ आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे हे एस.टी.महामंडळाचे कर्तव्य आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदर निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते राधाकिसन मैंद,शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू विजय छल्लारे,मंगेश मुंढे,गणेश पवार,तान्हाजी धुमाळ,लक्ष्मण भडांगे यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने प्रवाशांच्या या रास्त मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

 

संबंधित पोस्ट

न्याय देवते”चा पुतळा राज्य घटनेच्या मुल्यांचे प्रतीक – न्यायमुर्ती के. व्ही. स्वामीनाथन उच्च न्यायालयात “न्याय देवते”च्या पुतळ्याचे अनावरण

जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.8 ते 21 एप्रिल 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले

जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या” — आत्मसमर्पित संगीता उर्फ ललिता यांचे नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टलरोड सारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्वप्रकल्पांमध्ये सुरुवातीला आलेल्या समस्या, कायदेशीर व पर्यावरणीय परवाने, नागरिकांचे प्रश्न अशा अनेक आव्हानांवर नियोजनबद्ध तयारी, भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित दिवंगत बी.जी.देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असल्याने त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे.

vishwatmaklokswamivarta

प्री-मॅट्रीक व पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठीपात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta