vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन..

 

राज्य प्रतिनिधी-

सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर ती जीवन पद्धती आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार व आदर केला आहे. सहिष्णुता व सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबईतील महाराणी अहिल्यादेवी होळकर मैदान गोरेगाव येथे सुरु असलेल्या ४ – दिवसांच्या हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याला गुरुवारी (दि. ९) संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याचे आयोजन हिंदू आध्यात्मिक व सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

भारतातील लोक स्वभावतःच धर्मनिरपेक्ष आहेत. दयाभाव येथील संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात भारताने कोविड लस स्वतःपुरती न वापरता जगातील गरीब देशांना देखील विनामूल्य उपलब्ध करून दिली, असे राज्यपालांनी सांगितले. त्यामुळे मानवतेच्या सेवेसाठी भारताला बलशाली होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी राज्यपालांनी मेळाव्यात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. हे  प्रदर्शन दि. ९ ते १२ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून या भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे, असे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला हिंदू आध्यात्मिक आणि सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत सिंह कोठारी, शारदा रामप्रकाश बुबना,सीए के सी जैन, गिरीश भाई शहा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज प्रक्रियेबाबत खुलासा;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट;भारत – ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा…

vishwatmaklokswamivarta

नववर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय; आज 31 डिसेंबरला मद्य विक्री वेळेत शिथिलता अवैध मद्य विक्री, वाहतूक प्रकरणी तक्रार नोंदविण्याची आवाहन…

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा‘एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले श्रींच्या समाधीचे दर्शन..

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची निवड.

vishwatmaklokswamivarta