vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रशासनिक न्यायाधिकरणाची लोकअदालत;१७ प्रकरणात तडजोड

प्रशासनिक न्यायाधिकरणाची लोकअदालत;१७ प्रकरणात तडजोड

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरण, खंडपीठ औरंगाबाद येथे आज लोक अदालत संपन्न झाली. या विशेष लोक अदालतचे आयोजन महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरण, खंडपीठ औरंगाबाद, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. एकूण १७ प्रकरणात तडजोड करुन समेट करण्यात आला.

लोक अदालत कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबादचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती डी. के. जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासकीय सदस्य विवेक कारंजाकर, न्यायिक सदस्य ए. एन. कस्बेकर, तसेच कायदा सल्लागार टी. डी. देशमुख, मुख्य सचिवालय अधिकारी महेश सावंत आणि प्रमुख साक्षात्कार अधिकारी रेश्मा देशमुख उपस्थित होते.न्यायाधिकरणामध्ये प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांमध्ये लोक अदालतच्या माध्यमातून तडजोडी करण्यात आल्या. यात एकूण १७ प्रकरणांचे तडजोडीच्या माध्यमातून समाधान करण्यात आले. यामध्ये अर्जदार अ‍ॅड. करीम सय्यद आणि सरकारी साक्षात्कार अधिकारी रेश्मा देशमुख यांनी विशेष भूमिका बजावली. लोक अदालतच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र प्रशासनिक न्यायाधिकरण खंडपीठ औरंगाबादचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच न्यायिक व प्रशासकीय सदस्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

संबंधित पोस्ट

घणसोलीत सार्वजनिक ठिकाणी डेब्रिज टाकणारी दोन वाहने जप्त करीत 60 हजार रककमेची दंडात्मक कारवाई 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल जागतिक लक्झरी उत्पादन बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय ऐतिहासिक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे पाठीराखे*

vishwatmaklokswamivarta

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,