वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर..
राज्य प्रतिनिधी -पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले असून, आतापर्यंत सात हजारांहून अधिक घरे कोसळली आहेत. यामध्ये १३० घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत, तर उर्वरित घरांना आंशिक हानी झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. पाण्याचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरले आणि मातीची घरे क्षणात कोसळली. अजूनही जिल्ह्यातील अनेक कुटुंबे मातीच्या घरांत राहतात, त्यामुळे पावसाचा फटका त्यांना जास्त बसला आहे.