vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन..

 

राज्य प्रतिनिधी-

सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर ती जीवन पद्धती आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार व आदर केला आहे. सहिष्णुता व सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबईतील महाराणी अहिल्यादेवी होळकर मैदान गोरेगाव येथे सुरु असलेल्या ४ – दिवसांच्या हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याला गुरुवारी (दि. ९) संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याचे आयोजन हिंदू आध्यात्मिक व सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

भारतातील लोक स्वभावतःच धर्मनिरपेक्ष आहेत. दयाभाव येथील संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात भारताने कोविड लस स्वतःपुरती न वापरता जगातील गरीब देशांना देखील विनामूल्य उपलब्ध करून दिली, असे राज्यपालांनी सांगितले. त्यामुळे मानवतेच्या सेवेसाठी भारताला बलशाली होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी राज्यपालांनी मेळाव्यात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. हे  प्रदर्शन दि. ९ ते १२ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून या भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे, असे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला हिंदू आध्यात्मिक आणि सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत सिंह कोठारी, शारदा रामप्रकाश बुबना,सीए के सी जैन, गिरीश भाई शहा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय आणि त्रास देणाऱ्या विमान उड्डाणांच्या मोठ्या प्रमाणात व्यत्ययाबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने डीजीसीए इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि अकाउंटेबल मॅनेजर इसिड्रो पोरकेरास यांना कारणे दाखवा नोटीस

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणुकीसाठी 78 नामनिर्देशनपत्रे दाखल*

vishwatmaklokswamivarta

भारतीय नौदल दिनानिमित्त अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील खास व्हिडीओ नेव्ही  कडून जारी; सिंधुदुर्गात आज सेलिब्रेशन…

vishwatmaklokswamivarta

कसौटी जिंदगी की’ आणि ‘कट्टी बट्टी’ यांसारख्या शोमध्ये दिसणारे प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यात बुधवारी सरासरी 9.5 मि. मी. पावसाची नोंद

मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांंच्या जंगी सभेने वातावरणात बदल-जालना महानगर पालिका कुणी खाल्ली हे ते सांगत नाहीत-अर्जुनराव खोतकर!

vishwatmaklokswamivarta