अन् अंबडच्या जिल्हा परिषद शाळेत १९७२ च्या आठवणींना उजाळाअंबड जि.प. प्रशालेच्या १९७२ चे गेटू-गेदर :१९७२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन..
अंबड, (प्रतिनिधी)- अंबड येथील जिल्हा परिषद शाळेतील १९७२ च्याविद्यार्थ्यांचे गेट-टू-गेदर रविवारी संपन्न झाले असून त्या काळच्या सर्वआठवणींना माजी विद्यार्थ्यांनी उजाळा देत दुष्काळी परिस्थितीत कसे शिक्षण घेतले याचेही कथन केले. यावेळी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती होती.अंबड शहरातील जिल्हा परिषद शाळेतील१९७२ चे माजी विद्यार्थी आज मोठ-मोठ्या पदावर विराजमान होवून सेवानिवृत्ती झालेले आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस
अधिकारी, मंडळधिकारी, तलाठी तर उद्योगपती, कोणी डॉक्टर, शिक्षिका, शिक्षक झालेले आहेत. आज अशाच १९७२ च्या आजी-माजी विद्यार्थ्यांचे अंबडच्या जिल्हा परिषद शाळेत कुटूंबियांसोबत एकत्र जमवून १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीचा अनुभवासह त्या काळच्या शैक्षणिक परिस्थितीचा अनुभव उजागर
केला. आजच्या गेट-टु- गेदारला माजी विद्यार्थ्यांचे नातूही उपस्थित होते.यावेळी शिवप्रसाद लाहोटी, श्रीनिवास सोमाणी,विश्वासराव कुलकर्णी, डॉ.अरुण पाठक, सुभाष काळबंडे आदींची उपस्थिती होती. या अनेक विद्यार्थी
पुणे, नागपूर अशा मोठ-मोठ्या शहरात नौकरी करत होते. त्यामुळे त्याच ठिकाणी काही स्थाईक झाले परंतु आजच्या दिवशी सर्वच जण कार्यक्रमासाठीउपस्थित राहीले. यावेळी सर्वांनी आपले अनुभव, आपआपला परिचय करुन देत हे स्नेहमिलन साजरे केले.
०००००००००१- अंबडयेथील जिल्हा परिषदेतील १९७२ चे विद्यार्थ्यांनी आज गेट-टू-गेदरसाठी एकत्र येवून जुन्या आठवणींना उजाळा दिला.