vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी किशन जावळे

हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड, प्रतिनिधी : ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम लोक चळवळ बनली असून यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. यंदा देखील हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

 हर घर तिरंगा अभियानंतर्गत पहिला टप्पा 8 ऑगस्टपर्यंत, दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट आणि तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट या तीन टप्प्यात करावयाच्या कार्यवाही बाबत शासनाकडून सूचना आलेल्या आहेत. हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय/निमशासकीय सहकारी/खासगी आस्थापना कार्यालयात, अमृत सरोवर, वारसा स्थळे या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वारसा स्थळांच्या ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये विविध विषयांवर स्पर्धा तसेच, रॅली, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कालावधीत वाढ..

मॅग्नेट प्रकल्प, कोल्हापूर अंतर्गत शेतकरी अभ्यासदौरा यशस्वीपणे संपन्न

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

कुटुंबाच्या आरोग्यावरील खर्चाचे सर्वेक्षण होणार, सांख्यिकी कर्मचारी देणार निवडक कुटुंबाना भेटी • नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ५० गावे आणि शंभर अंगणवाड्या स्मार्ट इंटेजिलंट व्हाव्यात – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta