vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी किशन जावळे

हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड, प्रतिनिधी : ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम लोक चळवळ बनली असून यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. यंदा देखील हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

 हर घर तिरंगा अभियानंतर्गत पहिला टप्पा 8 ऑगस्टपर्यंत, दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट आणि तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट या तीन टप्प्यात करावयाच्या कार्यवाही बाबत शासनाकडून सूचना आलेल्या आहेत. हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय/निमशासकीय सहकारी/खासगी आस्थापना कार्यालयात, अमृत सरोवर, वारसा स्थळे या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वारसा स्थळांच्या ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये विविध विषयांवर स्पर्धा तसेच, रॅली, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

महाराष्ट्र दिनी पोलीस पाटील गिरीधर पाटील यांचा राज्यपाल पुरस्काराने-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान..

खामगांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु…

अनुसूचित जमाती कल्याण समितीची शाळा, आरोग्य केंद्राला भेटी

विशेष लेख-पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

vishwatmaklokswamivarta

नीट-पीजी 2025 परीक्षा उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू