vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कार्यालय, जालना येथे मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त “विश्वास, विकास व जनकल्याण” या विषयावर प्रबुद्ध नागरी संमेलन तसेच २५ जून १९७५ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर लादलेल्या आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “काळा दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीच्या रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ लोकशाही सेनानी व ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, रघुनाथ दीक्षित, अरुण उपाध्याय, बद्रीनाथ पठाडे, ॲड. विपुल देशपांडे, विजय कामड, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, नारायण पवार, धनराज काबलिये, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, अमोल कारंजेकर, वसंत शिंदे, शिवप्रकाश चितळकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, “२५ जून १९७५ हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने आणीबाणी लादून नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना कारागृहात डांबले आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादले. त्या कठीण काळात लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी हजारो कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. अशा लोकशाही सेनानींचे योगदान देश कधीही विसरू शकत नाही.” “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाने विकास, सुशासन आणि जनकल्याणाची नवी दिशा अनुभवली आहे. गरीब, शेतकरी, महिला, युवा आणि समाजातील प्रत्येक घटकाला केंद्रस्थानी ठेवून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले

यावेळी मंडळाध्यक्ष महेश निकम, सुनील खरे, संजय डोंगरे, अमोल धानूरे, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 00000

संबंधित पोस्ट

जागतिक योग दिनानिमित्त सांगलीत शनिवारी भक्ति योग कार्यक्रम- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे

दिल्लीच्या मराठी संमेलनाविरोधात विद्रोहीचा आवाज घुमणार छ.संभाजीनगरातअध्यक्ष,उद्घाटक व तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रम पत्रिका जाहीर !

vishwatmaklokswamivarta

आमदार-खासदार,संस्था चालकांचे बेकायदेशिर अतिक्रमण निष्काशित करुन दलित आदिवासी भूमिहिन कास्तपट्टे नावे करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरु करावी- अ‍ॅड. मगरे

एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी  जिल्ह्यातील १५ उपकेंद्रांभोवती प्रतिबंधात्मक आदेश..

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचामंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून आढावा

गॅस वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील