vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कार्यालय, जालना येथे मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त “विश्वास, विकास व जनकल्याण” या विषयावर प्रबुद्ध नागरी संमेलन तसेच २५ जून १९७५ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर लादलेल्या आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “काळा दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीच्या रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ लोकशाही सेनानी व ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, रघुनाथ दीक्षित, अरुण उपाध्याय, बद्रीनाथ पठाडे, ॲड. विपुल देशपांडे, विजय कामड, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, नारायण पवार, धनराज काबलिये, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, अमोल कारंजेकर, वसंत शिंदे, शिवप्रकाश चितळकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, “२५ जून १९७५ हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने आणीबाणी लादून नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना कारागृहात डांबले आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादले. त्या कठीण काळात लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी हजारो कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. अशा लोकशाही सेनानींचे योगदान देश कधीही विसरू शकत नाही.” “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाने विकास, सुशासन आणि जनकल्याणाची नवी दिशा अनुभवली आहे. गरीब, शेतकरी, महिला, युवा आणि समाजातील प्रत्येक घटकाला केंद्रस्थानी ठेवून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले

यावेळी मंडळाध्यक्ष महेश निकम, सुनील खरे, संजय डोंगरे, अमोल धानूरे, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 00000

संबंधित पोस्ट

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक तर भाग घेणाऱ्या स्पर्धकांनाही मिळणार प्रशस्तीपत्र 

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये #नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड

धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

विशेष सहाय्य योजना लाभार्थ्यांना आधार अद्यावतीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta