vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये #नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये #नांदेड जिल्ह्यात ६ हजार १९९ प्रकरणे निकाली, ३८ कोटींची तडजोड

 

नांदेड प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये नरेंद्र के. ब्रह्मे, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र के.ब्रह्मे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते

सदरील राष्ट्रीय #लोकअदालती मध्ये मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, एन.आय.अॅक्टची प्रकरणे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका वाद पुर्व मालमत्ता कराची प्रकरणे, गुन्हा कबुलीची प्रकरणे, आर.टी.ओ. व रेल्वे पोलीस विभागाची प्रकरणे, कौटुंबिक, कामगार, सहकार, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच प्रकरणे, सर्व बॅंक प्रकरणे, फायनान्स कंपनीची प्रकरणे, पंचायत समिती कर वसुली व दाखलपुर्व प्रकरणे, बि.एस.एन.एल. कंपनी प्रकरणे, एम.एस.ई.डी.सी.एल. कंपनी ईत्यादी प्रकरणे ठेवण्यात आली होती त्या करीता जिल्ह्यात एकुण 33 पॅनल तयार करण्यात आले होते.

दिनांक 14 मार्च 2026 रोजी झालेल्या लोक न्यायालयात नांदेड जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित एकूण 12629 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 1135 प्रकरणे निकाली व जवळपास 298184502 रुपयांचे तडजोड मुल्य होते. मालमत्ता थकबाकी व पाणीपट्टीची 4528 प्रकरणे निकाली निघाली व 45638383 रूपयांचे तडजोड मुल्य होते. असे एकूण 6199 प्रकरणे निकाली निघाली आणि तडजोड मुल्य 380460759 रूपये एवढे आहे.

विषेश म्हणजे 14 कोटींचे मुख्य दिवाणी प्रकरण आणि एम.ए.सी.टी.चे 103 प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदातीमध्ये निकाली निघाली.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद जी. देशपांडे यांनी राष्ट्रीय लोकअदालतीसाठी सहभागी झालेल्या सर्व पक्षकार, न्यायाधीश वर्ग, कर्मचारी वर्ग त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

०००००

संबंधित पोस्ट

बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत समानता, सुसुत्रता आणणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

ऊर्जा संवर्धनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी खुशखबर-. मुंबईतील पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल  वॉकवे पार्कचे उद्घाटन झाले उद्घाटन…

तामिळनाडू येथील जगप्रसिद्ध कार्तिक स्वामी या त्रिपुरा कुंटम मंदिरात पारंपारिक प्रथेनुसार दीप प्रज्वलन करण्यास गेलेल्या  भाविकाने दीप प्रज्वलन करण्यास राज्य सरकारने मनाई केल्यामुळे सरकारच्या निषेधार्थ आत्मदहन केले त्या भक्तास धारावी विभागातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

vishwatmaklokswamivarta

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

vishwatmaklokswamivarta

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजच पाटण्यात