vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वाद्यरंग’ सांस्कृतिक कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य विभागाचा वाद्यजागर; ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन ‘स्वराज्य की शपथ’ टपाल तिकीटाचे व महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ चे प्रकाशन

वाद्यरंग’ सांस्कृतिक कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्य विभागाचा वाद्यजागर; ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन’स्वराज्य की शपथ’ टपाल तिकीटाचे व महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ चे प्रकाशन

मुंबई प्रतिनिधी -सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत वाद्यरंग या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात ७५ पेक्षा जास्त दुर्मिळ व पारंपरिक वाद्याचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित स्वराज्य की शपथ या टपाल तिकीटाचे प्रकाशन व महात्मा गांधी संकलित वाङ्मय- भाग २ चे प्रकाशन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय विविध वाद्यांच्या जुगलबंदीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

‘वाद्यरंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कार्यक्रमातून २०० पेक्षा जास्त कलाकारांना आपली कला दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

वाद्यरंग हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम १४ ऑक्टोबर, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता कलांगण, रविंद्र नाट्यमंदीर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील तिन गावांसाठी टँकर मंजूर

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये मुंबई तील ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी 143 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती..

हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन-सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून,बोले सो निहाल’च्या जयघोषाने दुमदुमले खारघर…

पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा**अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या**- पालकमंत्री शंभूराज देसाई*

दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा तणाव न घेता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षा द्या

vishwatmaklokswamivarta