vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता व फिरत्या पथकांचा पहारा

घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी दक्षता व फिरत्या पथकांचा पहारा

 सांगली, प्रतिनिधी : घरगुती एलपीजी गॅसचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी नियुक्त जिल्हा स्तरावरील दक्षता व फिरते पथकांनी तपासणीचा वेग वाढवला असून, आज सांगली, मिरज, उरूण ईश्वरपूर, जतसह अनेक ठिकाणी गॅस एजन्सीची तपासणी केली. ही माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यात एलपीजी सिलिंडर वितरण आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सींची नियमित तपासणी करण्यात येत आहे. तसेच तक्रार आल्यास संबंधित एजन्सींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही अफवा किंवा गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

 सध्या जिल्ह्यात पुरेसा एलपीजी साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा 1713 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 94.9 मेट्रिक टन आणि आयओसीएल कंपनीचा ५८ मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून आणखी 1195.6 मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येण्यास मार्गस्थ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडर वितरित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाचीसांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप

१५० पेक्षा जास्त ट्रकमध्ये गणपतीच्या मूर्ती कचऱ्यात फेकण्याचे मोठे षडयंत्र; हिंदू समाजात तीव्र संताप !सरकारने तातडीने जबाबदारांवर गुन्हे दाखल करावेत  – हिंदु जनजागृती समितीची मागणी

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान….राज्य श्रेणीत महाराष्ट्र तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगर पालिका सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित.

vishwatmaklokswamivarta

भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण होणार !· मानव-श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन प्रमाणित बियाणे वितरण.