vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दार्जिलिंग परिसरातल्या पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन आणि दार्जिलिंगमधील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त…

दार्जिलिंग परिसरातल्या पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन, आणि

दार्जिलिंगमधील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त…

नवी दिल्ली प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दार्जिलिंग आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  पंतप्रधानांनी बाधित प्रदेशांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि या नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र व राज्य एजन्सी यांच्या समन्वित प्रयत्नांवर भर दिला.,मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट लिहिली आहे:

“मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या दार्जिलिंग आणि आसपासच्या भागातील परिस्थितीवर अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा.”

दार्जिलिंगमधील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त,

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथे पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की, “दार्जिलिंग येथे पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र वेदना होत आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना. जखमी झालेल्यांना लवकर बरे वाटो, ही प्रार्थना.

दार्जिलिंग आणि आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. प्रभावितांना सर्वतोपरी मदत पुरविण्यास सरकार कटिबद्ध आहे. “

संबंधित पोस्ट

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं एफ-१६ विमानासह एकूण सहा पाकिस्तानी विमानं पाडली..बंगळरू, कर्नाटक | #OperationSindoor वर बोलताना वायू सेनाध्यक्ष, एअर चीफ मार्शल एपी सिंग म्हणाले

शहरी भागातही आता नवीन स्वस्त भाव धान्य दुकाने!पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षणमंत्री छगन भुजबळ

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाने मराठा आरक्षण प्रश्नावर कोणतीही काळजी करू नये. हे सरकार मतासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी काम करत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. अशी घोषणा मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार-2024 साठी नामांकन अर्ज पाठविण्याचे पोर्टल येत्या 15 सप्टेंबर 2023 पर्यंत खुले…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

एक जिल्हा, एक उत्पादन- 2024’ पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी राज्याला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक कृषी आणि गैर कृषी क्षेत्रात रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी..