vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात दशसूत्री हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येत आहे. या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. दुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य वाढीस लागतांना दिसत आहेत. याचा प्रत्यय खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच आला. जंगला तांडा या सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत.

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोयगाव तालुक्याच्या भेटीवर असतांना अचानक जंगला तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, तहसिलदार मनिषा मेने, गटविकास अधिकारी डी.एस. अहिरे, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव, केंद्रप्रमुख फिरोज तडवी तसेच मुख्याध्यापक रामदास पुसे यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी शाळेतील दशसूत्री अंमबजावणीबाबत त्यांनी माहिती घेतली. त्याची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी हे इयत्ता दुसरीच्या वर्गात गेले. तेथे त्यांनी गणिताचा तास घेतला. काही गणिते विद्यार्थ्यांना सोडवावयास दिली. त्यावर अनेक प्रश्नही विद्यार्थ्यांना विचारले. या चुणचुणीत लहान मुलींनी त्यांना उत्तरे दिली. विद्यार्थ्यांचे गणिती कौशल्य वाढल्याचे दिसून आले. त्यासाठी शिक्षणाच्या अभिनव पद्धतीचा अवलंब शाळेत करण्यात येतो असे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांगितले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. शिक्षक व मुख्याध्यापकांचेही कौतुक केले. शाळेत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, शालेय परिसरातील भौतिक सुविधा या सारख्या उपक्रमांचेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी कौतुक केले.

०००००

संबंधित पोस्ट

विदर्भातील पूरस्थितीचा आढावा-मदत आणि पुनर्वसन कार्य तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश- मंत्री गिरीश महाजन

श्री तुळजाभवानी मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याची धाराशीव जिल्हाधिकार्‍यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली !हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांना यश, भक्तांच्या श्रद्धेचे संरक्षण !

vishwatmaklokswamivarta

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट

अनुकंपा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना हरकत/आक्षेप अर्ज सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उद्योजक घनश्यामदास गोयल यांच्या हस्ते स्त्री दुर्गा जागर मंडळाची आरती शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याची प्रार्थना…

vishwatmaklokswamivarta

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासहनाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट,कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट