vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट

जालना, (प्रतिनिधी)- सध्या उन्हाळ्याचे दिवस असून दिवसेंदिवस pउन्हाची तीव्रता वाढत आहे. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला आहे. त्यामुळे जिल्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होत आहे.अनेक तांडे, वस्त्या व गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. याठिकाणी तात्काळ टँकर सुरू करावेत. जेणेकरून सामान्य नागरिकास त्याचा दिलासा मिळेल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनियार यांना दिलेल्यानिवेदनात म्हटले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या

शिष्टमंडळाने शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले व जिल्हाप्रमुख भास्कररावअंबेकर यांच्या नेतृत्वात नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी जगदीश मिनियार यांची भेट घेतली. जालना जिल्हा परिषदेत नव्यानेच रुजू झालेले मुख्यकार्यकारी अधिकारी जगदीश मिनीयार यांचे शिवसेना (उद्धवबाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच जालना जिल्ह्यातील पाणी टंचाईसह इतरही समस्या मांडून जिल्ह्यातीलएकूण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.यावेळी जिल्हासंघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम,मुरलीधर शेजुळ, बाबुरावपवार, रमेश गव्हाड, मनीश श्रीवास्तव, मुरलीआबा थेटे, तालुका प्रमुख हरिहरशिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरयांनी म्हटले की, अनेक गावांना जोडणारे ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झालेले आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. जिल्ह्यातीलअनेक गावातील आरोग्य केंद्रांना कर्मचारी वर्ग व औषधांचा साठा पुरेशाप्रमाणात नाही. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होऊन आर्थिक भुर्दंड सहनकरावा लागतो. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या अनेक कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याने अनेक कामगार व मजुरांची हेहेळसांड होते. तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आलेले आहेत.त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी. तर अनेक शाळांना नवीन वर्ग खोल्या वइमारतीची गरज आहे. त्यांना त्या बांधून देण्यात याव्यात पुरेशा प्रमाणातशिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत जेणेकरून ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांना विनाकारण शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही.अशा अनेक मागण्या शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी मिनियार यांच्याकडे करण्यात आल्या. यासर्वच मागण्यांना मुख्यकार्यकारी अधिकारीमिनियार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी कुंडलिक मुठ्ठे, प्रभाकरउगले, अशोकराव हांडे, रामजी गायकवाड, शंकर जाधव, विठ्ठल पडूळ यांच्यासहअनेकांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी यंत्रणा राबविणार-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या गैरवापरावर नजर ठेवण्यासाठी आयकर विभागाचा 24×7 कार्यरत नियंत्रण कक्ष

vishwatmaklokswamivarta

वाचन, विज्ञान, कवितांच्या मैफलीने ग्रंथोत्सवात रंगत-दोन दिवसीय सांगली ग्रंथोत्सव 2024 ची सांगता

vishwatmaklokswamivarta

अतिधोकादायक इमारतींतील रहिवाश्यांच्या स्थलांतरासाठी ठोस पर्याय– मंत्री शंभूराज देसाई भाडेकरू संक्रमण शिबिरात जाण्यास तयार नसलेल्यांना ₹२०,००० भाडे प्रतिमाह