vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अंबाला येथील अन्नातून विषबाधा; रुग्णांवर उपचार सुरु

अंबाला येथील अन्नातून विषबाधा; रुग्णांवर उपचार सुरु

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- अंबाला ता. कन्नड येथे सामुदायिक विवाह सोहळ्यातील जेवणावळीत अन्नातून विषबाधा झाल्याने २५५ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील एका ८ वर्षीय बालकाचा रुग्णालयात येण्याआधीच मृत्यू झाला होता. उर्वरितांपैकी ८१ जणांना उपचाराअंती सुटी देण्यात आली असून उर्वरितांवर उपचार सुरु आहेत,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले आहे.

अंबाला ता. कन्नड येथे दि.२५ रोजी सामुदायिक विवाह सोहळ्यात ८ जोडप्यांचे विवाह झाले. या सोहळ्यास २७०० ते ३००० लोक सहभागी होते. या लोकांनी या विवाहसोहळ्यातील जेवणावळीत जेवण केले. त्यानंतर त्यांना अन्न विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. या पैकी काही लोकांना जुलाब, उलटी सारखे त्रास सुरु झाले. यातील २५५ रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेडा, वडनेर, औराळा व ग्रामिण रुग्णालय कन्नड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी ७१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. १५७ रुग्ण भरती आहेत. २७ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. ८१ रुग्णांवर उपचार झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली. या घटनेत सुरेश गुलाब मधे (८ वर्षे) रा. महादू खोरा या बालकाचा प्रा.आ.केंद्र करंजखेड येथे उपचारासाठी आणत असतांना उपचाराआधीच मृत्यू झाला. याच घटनेतील ३० रुग्ण हे प्राथमिक आरोग्य केंद्र बोलठाण ता. नांदगाव जि. नाशिक येथे तपासणी साठी गेले होते. या रुग्णांवर तेथेच उपचार सुरु असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना तेथेच निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. दाखल असलेल्या सर्व बाधीत रुग्णांवर करंखेडा, वडनेर, औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकामार्फत गावांमध्ये सर्व्हेक्षण, जनजागृती करण्यात येत असून उपचार व नियंत्रणात्मक कारवाई करण्यात येत आहे,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात चौकिदार पदासाठी 20 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

९ ते २३ जूनदरम्यान कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू

लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया – 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन• उत्तरदायित्व ही केवळ पाच वर्षांतून एकदा येणारी निवडणुकीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही; ती प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी आहे…• विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे; गडबड-गोंधळासाठीचे नव्हे…

vishwatmaklokswamivarta

ऐतिहासिक घटना: भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म

vishwatmaklokswamivarta

राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अतिवृष्टीस्थितीचा घेतला आढावा..

राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान

vishwatmaklokswamivarta