vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी

 

( सुरेश गायकवाड )मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी लागली असल्याचे त्या संस्थेचे विश्वस्त ॲड. बी.के. बर्वे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळेस संस्थेचे पदाधिकारी डॉ वामन आचार्य, डॉ. यु एम मस्के, अरविंद सोनटक्के,रिपाईचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रिपाईचे दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष शिरिष पवार, सरचिटणीस शिरीष चिखलकर, कुलाबा विधानसभेचे तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड ,कार्यालयीन सचिव दादासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळेस ॲङ बर्वे यांनी सांगितले की, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षपदाला आजतागायत सरकार दरबारी, न्यायालयात कुणी ही विरोध केला नाही. कसलाही दावा दाखल केला नाही. त्यातच संस्थेच्या अध्यक्षपदी दावा करणारे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष, नेते आनंदराज आंबेडकर यांच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा नाही. त्यामुळे त्यांनी तरी समाजामध्ये कोणताही गैरसमज पसरवू नये. याउलट समाजाच्या आणि विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने विधायक पाऊल उचलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

   इतकेच नव्हे तर बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली विकास करणार असून राज्यात सर्व जिल्ह्यात जमीन मिळवून विविध महाविद्यालये सुरु करणार आहेत. राज्याबाहेर अन्य राज्यात जमीन मिळवून संस्थेचा विकास करणार आहेत.

  तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये मेडीकल कॉलेज सुरु करण्याचा प्रयत्न असून गरीब मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण शिक्षण इंग्रजी माध्यमांद्वारे प्रयत्न आहे. कमवा आणि शिका या तत्वावर ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उभे करण्याचा त्यांचा मानस आहे.

    आजमितीस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी दलित शोषित पिडीत विद्यार्थ्याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती. या शैक्षणिक संस्थेचे मुंबई नवी मुंबई महाड औरंगाबाद नांदेड, पुणे, कोल्हापूर बंगलोर गया – बिहार याठिकाणी ४३ शाळा, महाविद्यालय आणि वस्तीगृहे आहेत. त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आठवले साहेब यांचा मानस असल्याचे ही त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

बेलापूरसह नेरूळ व वाशी येथे ‘डीप क्लिनींग ड्राईव्ह’

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबूर येथील घटना टिळक नगर येथील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सात्विक हॉटेल मध्ये तोडफोड…

पारनेरमध्ये चर्मकार महिलेच्या जमिनीचा आकारच शेजारी मालकाने बदलला*पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांकडे कारवाईची मागणी

vishwatmaklokswamivarta

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

सर्व यंत्रणांनी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली कार्यान्वित करावी : कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील सांताक्रुज जुहू येथे शिवजयंती उत्साहात साजरी