vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी

 

( सुरेश गायकवाड )मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी लागली असल्याचे त्या संस्थेचे विश्वस्त ॲड. बी.के. बर्वे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळेस संस्थेचे पदाधिकारी डॉ वामन आचार्य, डॉ. यु एम मस्के, अरविंद सोनटक्के,रिपाईचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रिपाईचे दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष शिरिष पवार, सरचिटणीस शिरीष चिखलकर, कुलाबा विधानसभेचे तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड ,कार्यालयीन सचिव दादासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळेस ॲङ बर्वे यांनी सांगितले की, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षपदाला आजतागायत सरकार दरबारी, न्यायालयात कुणी ही विरोध केला नाही. कसलाही दावा दाखल केला नाही. त्यातच संस्थेच्या अध्यक्षपदी दावा करणारे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष, नेते आनंदराज आंबेडकर यांच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा नाही. त्यामुळे त्यांनी तरी समाजामध्ये कोणताही गैरसमज पसरवू नये. याउलट समाजाच्या आणि विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने विधायक पाऊल उचलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

   इतकेच नव्हे तर बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली विकास करणार असून राज्यात सर्व जिल्ह्यात जमीन मिळवून विविध महाविद्यालये सुरु करणार आहेत. राज्याबाहेर अन्य राज्यात जमीन मिळवून संस्थेचा विकास करणार आहेत.

  तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये मेडीकल कॉलेज सुरु करण्याचा प्रयत्न असून गरीब मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण शिक्षण इंग्रजी माध्यमांद्वारे प्रयत्न आहे. कमवा आणि शिका या तत्वावर ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उभे करण्याचा त्यांचा मानस आहे.

    आजमितीस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी दलित शोषित पिडीत विद्यार्थ्याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती. या शैक्षणिक संस्थेचे मुंबई नवी मुंबई महाड औरंगाबाद नांदेड, पुणे, कोल्हापूर बंगलोर गया – बिहार याठिकाणी ४३ शाळा, महाविद्यालय आणि वस्तीगृहे आहेत. त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आठवले साहेब यांचा मानस असल्याचे ही त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

मनपा नियोजन विभागातून समाज संघटक दिनेश गमरे  सेवानिवृत्त

क्रीडा प्रबोधिनीतील मुलींचा विनयभंग करणाऱ्या व्यवस्थापकाला तात्काळ बडतर्फ करा – नंदा पवार यांची प्रशासनाकडे मागणी

जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात या मागणीचे  निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले

vishwatmaklokswamivarta

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी -मंत्री मंगलप्रभात लोढा§ जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार§ जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, म्हाडा संक्रमण शिबिराचा प्रश्नही लवकरच सोडवणार.

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास   – जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत! 

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट