vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट**दुर्गराज रायगडावर जल्लोषात अभिवादन*

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट**दुर्गराज रायगडावर जल्लोषात अभिवादन*

रायगड, प्रतिनिधी : संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य व पराक्रमाची साक्ष देणारे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या मान्यतेसह या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर महत्त्व अधोरेखित झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून रायगड किल्ल्यावर आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. राजसदरपासून लेझीम पथक व पोलीस पथकाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळीचा माळ येथे जाऊन महाराजांना पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत पोलीस मानवंदना दिली. तसेच गडावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती.

यावेळी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) महाड, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

०००

संबंधित पोस्ट

अहिल्यानगरच्या गणेश ढवणचा उपराष्ट्रपतींकडून गौरव संसदीय कार्यपद्धती संशोधनात विशेष कामगिरी

vishwatmaklokswamivarta

ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पाला प्रारंभ; मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार      -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह,शहरी बोगदा प्रकल्पातील टीबीएम प्रकल्पाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

१८ जिल्ह्यांसह राज्यभर अहिल्या भवन उभारण्याच्या कार्यवाहीस गती द्यावी- महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत ५ हजार महिलांना लवकरच रिक्षा वाटप करणार

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारासाठी आता संकेतस्थळावर अर्ज करावेत

शेतरस्त्यांची उपलब्धता ही ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत तज्ज्ञ समितीद्वारे सकारात्मक मार्ग काढणार –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस