vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर क

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर …

नवी दिल्ली प्रतिनिधी-लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर केलं. हे विधेयक २० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे.

नव्या विधेयकाचा मुख्य उद्देश चार प्राधान्य क्षेत्रांद्वारे रोजगार निर्मिती आणि शाश्वत ग्रामीण पायाभूत सुविधा उभारणं हा आहे. या अंतर्गत पाणी सुरक्षा, ग्रामीण मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित कामं आणि हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी विशेष कामांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आता १०० ऐवजी १२५ दिवसांच्या कामाची हमी देण्यात येणार असून, अधिक वेतन, संरक्षण आणि पारदर्शक अंमलबजावणी यंत्रणा उपलब्ध होणार आहे.

या विधेयकामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून विकसित भारताच्या संकल्पनेला बळ मिळेल, असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट

सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा- अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा..

ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचे अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

महिला व बालविकास विभागाने योजनांची अंमलबजावणी करताना मानवी दृष्टिकोन ठेवावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सरकारची भूमिका ठाम, कोणाच्याही ताटातील वाटा काढून दुसऱ्याला देणार नाही, ओबीसी नेत्यांनी गैरसमज करु नये – चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन.

vishwatmaklokswamivarta

सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा गौरव – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती