vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर क

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर …

नवी दिल्ली प्रतिनिधी-लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर केलं. हे विधेयक २० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे.

नव्या विधेयकाचा मुख्य उद्देश चार प्राधान्य क्षेत्रांद्वारे रोजगार निर्मिती आणि शाश्वत ग्रामीण पायाभूत सुविधा उभारणं हा आहे. या अंतर्गत पाणी सुरक्षा, ग्रामीण मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित कामं आणि हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी विशेष कामांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आता १०० ऐवजी १२५ दिवसांच्या कामाची हमी देण्यात येणार असून, अधिक वेतन, संरक्षण आणि पारदर्शक अंमलबजावणी यंत्रणा उपलब्ध होणार आहे.

या विधेयकामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून विकसित भारताच्या संकल्पनेला बळ मिळेल, असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट

परिवहन व बंदरे विभाग-राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा ठाणे क‌ाँग्रेस कडून निषेध  राहुल गांधी `रिस्पेक्टेड नेते’ – विक्रांत चव्हाण 

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

शेतीपूरक ई-वाहनामुळे शेतकऱ्यांना होणार लाभ- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कटरचा समावेश..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आजअखेर ४५ गॅस एजन्सी, ४० हॉटेल्सची तपासणी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

मुंबईची नव प्रभात: भारत-ब्रिटन संबंधांसाठी ‘ब्रिस्क’ (BRISK) युगाची सुरुवात