लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर क
लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर …
नवी दिल्ली प्रतिनिधी-लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर केलं. हे विधेयक २० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे.
नव्या विधेयकाचा मुख्य उद्देश चार प्राधान्य क्षेत्रांद्वारे रोजगार निर्मिती आणि शाश्वत ग्रामीण पायाभूत सुविधा उभारणं हा आहे. या अंतर्गत पाणी सुरक्षा, ग्रामीण मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित कामं आणि हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी विशेष कामांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आता १०० ऐवजी १२५ दिवसांच्या कामाची हमी देण्यात येणार असून, अधिक वेतन, संरक्षण आणि पारदर्शक अंमलबजावणी यंत्रणा उपलब्ध होणार आहे.
या विधेयकामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून विकसित भारताच्या संकल्पनेला बळ मिळेल, असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे.