हरेगाव मधील पिडीत मुलांच्या कुटुंबियांची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.
राज्य प्रतिनिधी-
हरेगाव मधील पिडीत मुलांच्या कुटुंबियांची हि ना.रामदास आठवले यांनी भेट घेतली.या पीडीत मुलांन मध्ये एक मुलगा मराठा समाजाचा आहे. गावगुंडांच्या त्रासाला सर्वच जाती धर्माच्या लोकांना बळी पडावे लागत आहे. झालेल्या प्रकाराचा रिपब्लिकन पक्षा तर्फे तिव्र निषेध करण्यात आला असून या प्रकरणी रिपब्लिकन पक्षाने सुरुवाती पासून पिडीत मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून प्रमूख आरोपी नाना गलांडे हा फरार आहे.या आरेपीला त्वारित अटक करुन कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तिव्र भावना पिडीत मुलांच्या कुटुंबियांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे व्यक्त केली
या प्रसंगी रिपाइं चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,रिपाइं चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे,संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव,विजय वाकचोरे,राजा कापसे,बाळासाहेब गायकवाड,भिमा बागूल,सुभाष त्रिभुवन सुनिल साळवे,पप्पू बनसोडे,दीपक गायकवाड रमाताई धिवर,मनालीताई जाधव आदि अन्य मान्यवर उपस्थित होते.