vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशराजकारण

महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, प्रतिनिधी-: जिल्हा महिला व बाल विकास विभागाने महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करावे व त्या महिलांनी जिल्ह्यात छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने प्रयत्न करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राकडील विविध योजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा उद्योग केंद्राने जिल्ह्यात उद्योग वाढविण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, सामूहिक प्रोत्साहन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत महिलांना माहिती देऊन उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या या योजना 5 टक्के बीज भांडवल, 35 टक्के अनुदान व उर्वरित कर्ज अशा स्वरूपात राबवल्या जातात. उद्योगाची मर्यादा एक लाख रूपये असणाऱ्या उद्योगासाठी आपण स्वत: बीज भांडवलाची रक्कम उभा करून देऊ, असे त्यांनी आश्वासीत केले. तसेच, महाविद्यालयीन युवतींनाही कमवा व शिका या तत्त्वावर शिक्षणासाठी मदत म्हणून प्रायोगिक तत्त्वावर विलिंग्डन महाविद्यालय परिसरात एखादे युनिट सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योग उभारणीच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी करण्यात येत असलेल्या विविध योजनांबद्दल सविस्तर सादरीकरण केले.

000

संबंधित पोस्ट

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाईकारवाईत १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम

एसटी महामंडळातील सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक –

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा बुधवार दि.१८ रोजी

महसूल दिनानिमित्त बेळी येथे २३ घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश शक्ती प्रदत्त समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी

विनापरवाना शेतमाल खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार – पणन मंत्री जयकुमार रावल