vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी,माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश …

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी,माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांना यश …

जालना,  (प्रतिनिधी) – जालना शहरातील उद्योग नगरी परिसरातील श्री सत्यजित राय, उत्तर भारतीय संघाचे शितला प्रसाद पांडे व उत्तर भारतीय नागरिकांनी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेऊन जालना ते पटना रेल्वे मार्गाची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन जालना व परिसरातील सुमारे पंचवीस हजार उत्तर भारतीय नागरिकांच्या सोयीसाठी या गाडीची मागणी केली.

या प्रयत्नाला यश आले असून रेल्वे प्रशासनाने नांदेड-रायचूर व पूर्णा- पटना या दोन्ही गाड्यांचा विस्तार आता जालना पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-रायचूर ही गाडी तात्पुरत्या स्वरूपात जालना वरून सुरू होणार असून प्रथमतः नांदेडला जाईल आणि त्यानंतर रायचूरपर्यंत धावेल.

तसेच पूर्णा-पटना ही गाडी देखील जालना पासूनच उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे जालना, परभणी, पूर्णा व नांदेड या भागातील प्रवाशांना रायचूर व पटना भागात जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ व खर्च वाचणार आहे. या निर्णयाचे स्वागत नागरिकांकडून होत असून माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

जिल्हाधिकारी कार्यालयातमहात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक स्व.पल्लवी सरोदे यांची शोकसभा संपन्न आठवणी व्यक्त करताना अनेकांना अश्रू झाले अनावर…

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांसाठी आता नवीन सेवार्थ प्रणाली;जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षण· पेपरलेस पद्धतीने सादर होणार वेतन देयके

vishwatmaklokswamivarta

दि.11 जानेवारी रोजी किल्ले रायगड येथे गडरोहण स्पर्धेचे आयोजन,इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागामार्फत कोकण विभागातीलसर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी मोहीम..