vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्रीम.विजया चामे यांचे रस्ता सुरक्षा दूत म्हणून अत्यंत कौतुकास्पद कार्य

श्रीम.विजया चामे यांचे रस्ता सुरक्षा दूत म्हणून अत्यंत कौतुकास्पद कार्य

पनवेल प्रतिनिधी

श्रीम.विजया चामे यांनी आपल्या कर्तव्यकाळात प्रशासकीय जबाबदारी सक्षमपणे पार पाडली व त्यासोबतच माणुसकीच्या नात्याने आणि रस्ता सुरक्षा दूत म्हणून अत्यंत कौतुकास्पद कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

 आपत्कालीन परिस्थितीत तत्परता (जीवनरक्षक कार्य): जानेवारी 2025: भरारी पथकात कर्तव्य बजावत असताना, एका भीषण अपघातातील जखमी मुलाला कोणतीही वेळ न घालवता कार्यालयाच्या शासकीय वाहनातून तात्काळ एमजीएम (MGM) हॉस्पिटलमध्ये दाखल केले व उपचार सुरू होईपर्यंत पाठपुरावा केला. मे 2025: मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर रात्रीच्या वेळी भरारी पथकाचे काम करत असताना, एका अपघातग्रस्त टेम्पो चालकाला अॅम्बुलन्सच्या साहाय्याने एमजीएम हॉस्पिटलमध्ये वेळेत दाखल करून त्याचे प्राण वाचवण्यास मदत केली.

रस्ता सुरक्षा बाबत जनजागृतीः रस्ता सुरक्षा बाबत जनजागृती करण्याच्या उ‌द्देशाने त्यांनी विविध कंपन्या, शाळा, महावि‌द्यालये आणि निवासी वसाहतींना भेटी दिल्या. तेथे नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देऊन रस्ता सुरक्षेबाबत प्रभावी मार्गदर्शन केले व अपघात कमी होण्याचे दृष्टीने विशेष प्रयत्न केले.

 महिला सक्षमीकरणः जानेवारी महिन्यात त्यांनी 250 हून अधिक दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा चालक महिलांची रस्ता सुरक्षा रॅली’ यशस्वीपणे आयोजित केली. या उपक्रमाद्वारे महिला चालकांचा कार्यालयामार्फत गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

विशेष कामगिरीबाबत गुणगौरवःश्रीम. विजया चामे यांचे उल्लेखनीय कार्याचेच फलीत म्हणून परिवहन विभागाच्या वर्धापनदिनी आयोजीत सोहळयात दि. 01.03.2026 रोजी मा.ना.परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. ही बाब प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल संपूर्ण विभागासाठी अभिमानास्पद आहे.

नाव- श्रीमती विजया धर्मेंद्र चामेपदनाम- सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलमोबाईल क्रमांक: 7769876124

०००००००

संबंधित पोस्ट

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत उपराष्ट्रिय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम…

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (#एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात प्रभावी लढाठाणे जिल्ह्यात १४–१५ वयोगटातील सर्व मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण राबविणार

vishwatmaklokswamivarta

सैनिक कल्याण सेवा आता ऑनलाईन;नावनोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta