vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला..

 राज्य प्रतिनिधी –

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जींद आणि सोनीपत ही शहरं आता हायड्रोजन रेल्वे🥰t तंत्रज्ञानाच्या इतिहासात कायम स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

 

🌿 १० डब्यांची, ३,२०० अश्वशक्तीची ही रेल्वे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन असून, तिच्यातून शून्य कार्बन उत्सर्जन होतं. ही भारताच्या तांत्रिक क्षमतेचं आणि हरित वाहतूक क्षेत्रातील नेतृत्वाचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

 

⚡ भारतीय रेल्वेचं जवळपास संपूर्ण विद्युतीकरण झाल्यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षितता अधिक मजबूत झाली असून, जागतिक इंधन पुरवठ्यातील अडचणींचाही रेल्वे सेवांवर परिणाम होणार नाही, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 प्राप्त माहितीनुसार –

🏗️ हरियाणा दौऱ्यात पंतप्रधानांनी ₹१४,७०० कोटींहून अधिक किमतीच्या रस्ते, रेल्वे आणि आरोग्य क्षेत्रातील विकास प्रकल्पांचं उद्घाटन व भूमिपूजन केलं. तसेच प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांना घरांच्या चाव्याही सुपूर्द केल्या. स्वच्छ भारत अभियानातील हरियाणाच्या योगदानाचं त्यांनी कौतुक करत, जींद ही इतिहास, अभिमान आणि अध्यात्माची भूमी असल्याचं सांगितलं

संबंधित पोस्ट

बुलढाण्यात अवैध मद्यविक्री विरोधात धडक मोहीम; ११० गुन्हे, १४.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

यात्रा ठिकाणी अन्न व्यावसायिकांनी नोंदणी प्रमाणपत्राशिवाय व्यवयाय करु नये *-अन्न व औषध प्रशासन विभाग*

vishwatmaklokswamivarta

टंचाई असलेल्या ठिकाणचे टँकर प्रस्ताव तातडीने पाठवा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

तहसीलदार रंगनाथ मेंडके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्गम भागातील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावी- ॲड. आशिष जयस्वाल

पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा**अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या**- पालकमंत्री शंभूराज देसाई*