vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई महानगर क्षेत्रात काळी-पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षांच्या भाडेदरात वाढ सुधारित दर 1 सप्टेंबरपासून लागू…

मुंबई महानगर क्षेत्रात काळी-पिवळी टॅक्सी व ऑटोरिक्षांच्या भाडेदरात वाढ सुधारित दर 1 सप्टेंबरपासून लागू…

ठाणे, प्रतिनिधी : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रातील सीएनजी चालित काळी-पिवळी मीटर टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाडेदरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ६८ अन्वये गठित या प्राधिकरणाची बैठक २० ऑगस्ट २०२६ रोजी अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

वाहनांच्या सरासरी किंमतीत, ग्राहक निर्देशांकात आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात झालेली वाढ लक्षात घेता, शासन निर्णय दिनांक ९ मार्च २०२० द्वारे स्वीकृत खटुआ समितीच्या सूत्रानुसार ही भाडेवाढ करण्यात आली आहे.

सुधारित भाडेदरांचा तपशील

काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) : किमान देय भाडे (पहिले १.५ किलोमीटरसाठी): रुपये ३१/- वरून वाढवून रुपये ३३/-. पुढील प्रतिकिलोमीटर भाडे: रुपये २०.६६/- वरून वाढवून रुपये २१.९०/-

ऑटोरिक्षा (सीएनजी) : किमान देय भाडे (पहिले १.५ किलोमीटरसाठी): रुपये २६/- वरून वाढवून रुपये २७/-. पुढील प्रतिकिलोमीटर भाडे : रुपये १७.१४/- वरून वाढवून रुपये १८.२२/-.अंमलबजावणी व अटी :- ही भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व सीएनजी काळी-पिवळी मीटर टॅक्सी व ऑटोरिक्षांना लागू राहील. उपरोक्त भाडेदर सुधारणा दिनांक ०१/०९/२०२६ पासून अमलात येईल. सुधारीत भाडेदरानुसार भाडेमिटरचे (Meter) रिकॅलीब्रेशन करून घेणे बंधनकारक असून, जे परवानाधारक रिकॅलीब्रेशन करून घेतील, केवळ त्याच ऑटोरिक्षा व टॅक्सींना ही भाडेवाढ लागू होईल. भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन दिनांक ०१/०९/२०२६ ते दिनांक ३०/११/२०२६ या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे रोहित काटकर यांनी कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

पालकमंत्र्यांनी घेतला अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आढावा

vishwatmaklokswamivarta

औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे पल्स परिषदेतील चर्चासत्रात सहभागी तज्ञांचे मत

जालना जिल्ह्यात 25 ते 27 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी-  विजेच्या कडकडाटासह 25 ते 27 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता-नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा

पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याने काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण