vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अग्निपथ सैन्य भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय…

अग्निपथ सैन्य भरतीसाठी वयोमर्यादेत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय…

नवी दिल्ली प्रतिनिधीसंरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे दोन वर्षांपासून सैन्य भरती न झाल्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अग्निपथ सैन्य (Agnipath Scheme) भरतीसाठी देशभरातुन होत असलेल्या विरोधाला केंद्र सरकराने (Central Govt) मोठा निर्णय घेतला असुन याची वयोमर्यादेत 23 वर्ष इतकी ठेवली आहे. याआधी ही वयोमर्यादा 21 वर्ष इतकी होती. गेल्या दोन वर्षात एकही भरती न झाल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. गेल्या काही दिवसापासुन या योजनेविरोधात मोठी आंदोलने झाली आहे. बिहारमधील नवाद जिल्ह्यात भाजप कार्यालयालाही आंदोलकांनी आग लावल्याची घटना समोर आली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनामुळे दोन वर्षांपासून सैन्य भरती न झाल्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

अग्निपथ योजनेची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी तिन्ही दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत केली. ज्याला टूर ऑफ ड्यूटी असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत संरक्षण मंत्रालयाने सैन्य भरतीच्या नियमांमध्ये व्यापक बदल केले आहेत. त्यामुळे योजनेनुसार चार वर्षांसाठी सैन्यात भरतीची संधी खुली आहे

त्याच वेळी, अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीची वयोमर्यादा संरक्षण मंत्रालयाने 17.5 वरून 21 वर्षे निश्चित केली होती. ज्यामध्ये संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी आंशिक बदल केले आणि प्रथमच कमाल वयोमर्यादा 23 वर्षे केली.

 

संबंधित पोस्ट

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा ‘एक हात मदतीचा’ खचून जाऊ नका, प्रशासन, समाज तुमच्या सोबत-जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

कर्मवीर दादासाहेबांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा..

vishwatmaklokswamivarta

जून ते सप्टेंबरमध्ये सर्वसाधारणपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता*दीर्घावधी पर्जन्यमानाच्या अंदाज जारी…

नोएडातील ट्वीन्स टॉवरप्रमाणे अनिल परबांचा साई रिसॉर्ट उद्ध्द्वस्त करावा, किरीट सोमय्यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अतिवृष्टीग्रस्तांना दिली वाढीव मदत; शासन निर्णय जारी करत दिला 3 हजार 501 कोटी रुपयांचा निधी

vishwatmaklokswamivarta

आदर्श आचारसंहिता नियमांचे काटेकोर पालन होण्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta