
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 1.08 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंत्रिमंडळाची मंजुरी….
नवी दिल्ली प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. खताच्या किमतीत सरकार वाढ करणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. खरीप हंगामासाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. खताच्या किमतीत सरकार वाढ करणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. खरीप हंगामासाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. युरियासाठी सरकार 70,000 कोटी रुपये आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी 38,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमतीत तफावत असताना देशातील शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळावे आणि त्याचा बोजा त्यांना सहन करावा लागू नये हे सरकारसाठी आवश्यक असल्याचे केंद्राने म्हटले आहे. गेल्या वर्षी सरकारच्या अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी 2.56 लाख कोटी रुपये खर्च केले होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली
यासह, केंद्र सरकारने बुधवारी आयटी हार्डवेअरसाठी उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (Production linked Incentive-PLI) च्या दुसऱ्या फेजला 17,000 कोटी रुपयांच्या एकूण अर्थसंकल्पीय परिव्ययासह मंजुरी दिली.
बाजारपेठेत खतांच्या किमतीत तफावत असताना देशातील शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळावे आणि त्याचा बोजा त्यांना सहन करावा लागू नये हे सरकारसाठी आवश्यक असल्याचे केंद्राने म्हटले आहे.



