vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शेतकऱ्यांना प्राधान्य ; दलित आदिवासींना पाठबळ आणि मध्यम वर्गीयांना साथ देत देशाचा विकास घडविणारा आदर्श अर्थसंकल्प – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*शेतकऱ्यांना प्राधान्य ; दलित आदिवासींना पाठबळ आणि मध्यम वर्गीयांना साथ देत देशाचा विकास घडविणारा आदर्श अर्थसंकल्प – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2025 -26 चा सादर केलेला अर्थसंकल्प एक आदर्श अर्थसंकल्प आहे.शेतकऱ्यांना प्राधान्य देणारा; दलित आदिवासींना पाठबळ देणारा; मध्यमवर्गीयांना साथ देऊन देशाचा विकास घडविणारा अर्थसंकलप आहे.या अर्थसंकल्पाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत.विरोधी पक्षाला हा अर्थसंकल्प निरूपयोगी वाटत असेल तर विरोधी पक्षाचा हा दृष्टिकोनच निरूपयोगी आहे असा टोला रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांना लगावत अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

केंद्रीय अर्थसंल्पात दलित आदिवासींसाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.त्यात सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत विविध कल्याणकारी योजनांसाठी 1 लाख 68 हजार कोटी तर आदिवासी कल्याण मंत्रालय साठी 1 लाख 19 हजार कोटींची तरतूद आहे.त्यामुळे दलित आदिवासींच्या कल्याणासाठी या वंचित घटकांना पाठबळ देणारा हा अर्थसंकल्प आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

शेतकऱ्यांना प्राधान्य देत अन्नदाता शेतकरी हा विकासाच्या गाडीचे इंजिन आहे.शेतकऱ्यांना प्राधान्य देत त्यांच्या विकासासाठी उत्पादन वाढीसाठी अनेक योजना अर्थसंकल्पात आहेत.या अर्थसंकल्पात विद्यार्थी; गृहिणी; ज्येष्ठ नागरिक; दिव्यांग तसेच उद्योजक ; नोकरदार मध्यम वर्ग सर्व वर्गाचे हित साधणारा हा आदर्श अर्थसंकल्प आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.

महाराष्ट्र राज्यात मेट्रो ;रेल्वे;नदी संवर्धन; सिंचन आदी प्रकल्पांसाठी भरीव निधी देण्यात आला आहे.त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाचे आम्ही स्वागत करीत आहोत असे ना.रामदास आठवले म्हम्हणाले.

0000000

 

संबंधित पोस्ट

गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामाचे रँकीग नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द    -पालकमंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा विकास आराखडा सादर  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे प्रभावी सादरीकरण..वर्ल्ड बँक व ‘मित्र’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आय.आय.एम. नागपूर येथे परिषद

केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण1 फेब्रुवारी 2026 रोजी आपला सलग नववा केंद्रीय बजेट संसदेत सकाळी 11 वाजता सादर करणार

vishwatmaklokswamivarta

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन होणार दक्षता समिती शिक्षण मंडळाचा निर्णय

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी-कार्याचे स्मरण आवश्यक- श्रीमंत अमरजीत राजे बारगळ