vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हिंदुस्थानी संगीताचा स्वर प्रभाकर दिगंतात विसावला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली…

हिंदुस्थानी संगीताचा स्वर प्रभाकर दिगंतात विसावला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली…

 

मुंबई, राज्य प्रतिनिधी- हिंदुस्थानी संगीतातील स्वर भास्कर दिगंतात विसावला आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

धारदार आवाज आणि पल्लेदार तानांनी भारती संगीत क्षेत्राचे स्वर नभांगण उजळून टाकणारा किमयागार म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर अजरामर राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.मुख्यमंत्री फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, पंडित कारेकर यांचा स्वर म्हणजे हिंदुस्थानी संगीतातील अपूर्व ठेवा आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरेतील शिष्योत्तम म्हणता येईल, अशा पंडित कारेकर यांची सांगितीक कारकिर्द देदिप्यमान राहीली. त्यांनी आपल्या गुरूजनांचा नाव लौकिक जपला आणि सातासमुद्रापार नेला. पंडितजींच्या खास शैलीतील स्वरांनीच कित्येकांच्या दैनंदिनीची सुरवात होत असे. त्यांच्या स्वरांनी अभंग, भजन, नाट्यगीत ऐकणाऱ्यांची पिढी तयार केली. दर्दी रसिकांची दाद मिळविण्याबरोबरच, श्रोतृ वर्ग निर्माण करण्याचे कार्य पंडितजीच्या स्वरांनी केले. पंडितजींच्या निधनाने संगीत क्षेत्रातील तीन पिढ्यांना जोडणारा मार्गदर्शक दिगंतात विसावला. ते स्वरांनी अनंतकाळ आपल्या सोबतच राहतील. त्यांचे निधन ही भारतीय संगीत क्षेत्राची भरून निघणार नाही अशी हानी आहे. पंडितजीच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही कारेकर कुटुंबिय आणि पंडितजीच्या रसिक चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा काढून सिन्दुर ऑपरेशनचा विजय साजरा*

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमआरोग्य अभियानांमध्ये सर्व घटकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी स्वामी,२४ ग्रामपंचायतींना रजत तर ३०४ ग्रामपंचायतींना कास्य पदक सन्मान..

बालकांच्या आधारवरील बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहीम

विकसित महाराष्ट्र 2047; नागरिक सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवा!जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे नागरिकांना आवाहन

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथेअभिरुप मुलाखत कार्यक्रम-2024

vishwatmaklokswamivarta

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा