vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’लाराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’लाराज्यपाल सी.पी.राधाकृष्णन उपस्थित राहणार-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले निमंत्रण

 

   मुंबई, प्रतिनिधी: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी या महोत्सवाला उपस्थित रहावे अशी विनंती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी येथे भेट घेवून विनंती केली असून त्यांच्या विनंतीला राज्यपाल यांनी संमती दर्शवून ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

   पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणारे लेझर शो, टेंट सिंटीचे आयोजन, विविध परिसंवाद, देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम याची माहिती त्यांनी राज्यपाल यांना दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मे रोजी उद्घाटन होणार आहे. तसेच या उद्घाटनाप्रसंगी मंत्रिमंडळातील सदस्यही उपस्थित राहणार आहेत.     राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘दौलत : दौलतराव श्रीपतराव देसाई’ चरित्र ग्रंथ पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिला. दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांचे कार्य आजच्या पिढीला मार्गदर्शक असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी-प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 साठी वेव्हएक्सने स्टार्टअप क्षेत्राकडून अर्ज मागवले

vishwatmaklokswamivarta

चला… मराठीतच बोलू या!!

जिल्हा प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात सामंजस्य करार०००बिडकीन येथे जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विकासासाठी पुढाकार

श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू. कवड यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने लोक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री सारख्या तीर्थस्थळांवर गंगा नदीचे पवित्र पाणी आणण्यासाठी जातात.

आसाराम बापूला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन..