vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात- आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात- आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

अमरावती, प्रतिनिधी : विविध आस्थापनांवर सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडून स्वच्छतेचे काम करून त्यांना असलेल्या सर्व सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मैला उचलणाऱ्या आणि गटार साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यास प्रतिबंध व पुनर्वसन, तसेच अधिनियम 2013 च्या अंमलबजावणी व सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांच्यासह संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. डागोर यांनी सफाई कामगारांच्या निवासस्थानाबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची 25 वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना पट्टेवाटप, त्यावरील घरकूल याचा प्रस्ताव शासनास सादर करावा. तसेच श्रम श्राफल्य योजनेतून घर बांधण्यासाठी सहकार्य करण्यात यावे. जिल्ह्यात या कर्मचाऱ्यांना आवाससाठी अंमलबजावणी करावी. यातील कोणतेही प्रकरण प्रलंबित राहू नये. याबाबत 1 महिन्याच्या आत कार्यवाही करावी. निवासस्थानासोबतच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी नियमित करण्यात यावी. यासाठी शिबीरे आयोजित करावेत.

इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच सफाई कामगारांनाही नियम लागू आहेत. आजाराच्या उपचाराची प्रतिपूर्ती देण्यात यावी. त्यांना आयुष्मान योजनाही लागू असल्याने त्यांचे कार्ड काढण्यात यावेत. तसेच कॅशलेस सुविधा उपलब्ध होण्यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करावी. कर्मचाऱ्यांना आठवडी सुट्टी देण्यात यावी. कर्मचारी निवृत्त किंवा मृत झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना विनाविलंब सर्व लाभ देण्यात यावेत. आदिवासी विकास विभागातील धारणी येथील कर्मचाऱ्यांची दहा वर्षे सेवा होऊनही कायम करण्यात आलेले नसल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. डागोर यांनी दिले.

000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता: महर्षि वाल्मिकी जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

vishwatmaklokswamivarta

100 दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 1.50 लाखाहून अधिक संचिकांचे वर्गीकरण**कार्यालयीन स्वच्छता व सुयोग्य अभिलेख जतन पध्दतीवर भर*

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या नाताळ भव्यतम सोडतीचा निकाल जाहीर…

vishwatmaklokswamivarta

सिल्लोड तालुक्यातील साखळी बंधारा प्रकल्पाच्या पुनर्रचनेसंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी- मंत्री अब्दुल सत्तार

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली शपथ, पुढचे १५ महिने राहणार देशाच्या सरन्यायाधीशपदी.

vishwatmaklokswamivarta

अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण