vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

आटपाडीत घरेलू कामगारांच्या घरी जावून जीवनावश्यक धान्याचे वाटप- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराघरात पोहोचले धान्य- प्रशासनाचा माणुसकीचा उपक्रम 

आटपाडीत घरेलू कामगारांच्या घरी जावून जीवनावश्यक धान्याचे वाटप- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराघरात पोहोचले धान्य- प्रशासनाचा माणुसकीचा उपक्रम

 सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील कोणताही घटक उपेक्षित राहू नये, यासाठी प्रशासन संवेदनशील असून, घरेलू कामगारांच्या कल्याणासाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या आदेशानुसार आणि आटपाडी तहसीलदार सागर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यात घरेलू कामगारांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

 या उपक्रमात गहू, तांदूळ, डाळी, साखर आदि साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी प्रत्येक लाभार्थीच्या घरी जाऊन पात्रतेची खातरजमा करण्यात आली. ज्यामुळे यादीतील पारदर्शकता आणि वितरणात अचूकता राखली गेली.

  या उपक्रमात जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, आटपाडी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी जयश्री बाजड (हिवसे), निवासी प्रभारी नायब तहसीलदार दादासाहेब पुकळे, अन्नसुरक्षा निरीक्षक नितीन शिंगाडे, तसेच महसूल व पुरवठा विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.घरेलू कामगार समाजातील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या अडचणींची दखल घेऊन गरजूंपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. लाभार्थींनीही प्रशासनाच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. “आमच्यासारख्या कामगार कुटुंबांना वेळेवर धान्य मिळाले, हे आमच्यासाठी खूप मोठे आहे,” असे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले.

    प्रशासनाने या उपक्रमाला नियमित स्वरूप देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, गरजूंच्या सन्मानाची जपणूक करत यापुढेही असे उपक्रम राबवले जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

000000

00000

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात सपन्न

अमृत दुर्गोत्सव – पनवेलमध्ये दुर्ग बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसादविद्यार्थ्यांनी साकारल्या ऐतिहासिक दुर्गांच्या अप्रतिम प्रतिकृती..

vishwatmaklokswamivarta

मातोश्री मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 20 सप्टेंबरची मुदत

vishwatmaklokswamivarta

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाचे दोन महत्त्वाचे निर्णय,सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी मदत, नापीक जमिनी मनरेगातून लागवडीयोग्य करता येणार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे तातडीने अंमलबजावणीचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

vishwatmaklokswamivarta