vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एन. डी. आर. एफ. पथकाने सतर्क राहून कामकाज करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

एन. डी. आर. एफ. पथकाने सतर्क राहून कामकाज करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

 सांगली, प्रतिनिधी : संभाव्य पूरपरिस्थिती व आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने सतर्क राहून कामकाज करावे. संभाव्य पूरप्रवण भागाची, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावांची पाहणी करावी. मदत व बचाव कार्याच्या अनुषंगाने स्थानिक पूर्वमाहिती घ्यावी. लोकांमध्ये आपत्तीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.

 आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पथक प्रमुख संतोषकुमार तिवारी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, व पथकातील जवान उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, आगामी मान्सून व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासन सज्ज असून, बचाव व मदत कार्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाची मदत महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी स्थानिक प्रशासन, पोलीस दल व संबंधित विभागाशी समन्वय ठेवून कामकाज करावे. आपत्कालिन परिस्थितीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने त्वरित प्रतिसाद द्यावा. जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक ठिकाणी मदतकार्य पोहोचविण्यासाठी त्यांच्या साधनसामुग्रीसह दक्ष राहण्याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.

 मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एन.डी.आर.एफ. पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी, मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी.आर.एफ) एक पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

अलिबाग जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

फसव्या भरती संदेशापासून सावधान; आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे* जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने जनजागृती * जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद अर्धा तास चर्चा-महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढविली जाईल- मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

कर्जत येथे जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा दौरा