vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी १६ मार्च रोजी,सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी ९ मार्च रोजी निवडणूक

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी १६ मार्च रोजी,सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी ९ मार्च रोजी निवडणूक

 

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ११(१) आणि ५९(१) नुसार, सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून सुरू होतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची पहिली बैठक २० मार्च २०२६ पूर्वी आयोजित करण्यात येणार आहे. याअनुषंगाने लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड १६ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. तसेच, लातूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवडणूक ९ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.

लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवडणूक प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहामध्ये पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी लातूरच्या अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, लातूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुका संबंधित पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात येणार असून, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडणूक प्रक्रियेसाठी संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना आवश्यक नोटिसा निर्गमित केल्या असून, सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांनी केले आहे.*****

संबंधित पोस्ट

जारीदासह परिसरातील ५० गावांसाठी खात्रिशीर विजेची सोय झाल्याने मेळघाटातील आदीवासी बांधव आणि महावितरणकडून मा. सरन्यायाधिश भुषण गवई यांचे आभार

vishwatmaklokswamivarta

कोटगल येथे साथ फाउंडेशन व सार्वजनिक वाचनालयातर्फे शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर १० नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम;शाळास्तरावर दि.१५ पासून जनजागृतीसाठी विविध उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती-29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार- राज्य लोकसेवा आयोगाची माहिती

थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावी खानवडी, पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस