vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा आज होणार सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयात गौरवमुर्तींचा सन्मान सोहळा व चित्रप्रदर्शनाचे आयोजन

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा आज होणार सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयात गौरवमुर्तींचा सन्मान सोहळा व चित्रप्रदर्शनाचे आयोजन

            बुलढाणा, प्रतिनिधी) : देशातील १९७५ साली झालेल्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील बंदिवास सोसलेल्या व्यक्तींचा बुधवार, दि. २५ जून रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे दुपारी १२ वाजता सन्मान सोहळा व प्रशासकीय इमारतीत चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जिल्हावासियांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
देशात दि. २५ जून १९७५ ते ३१ मार्च १९७७ या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान व यथोचित गौरव करण्याच्या व आणीबाणी संदर्भात प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना केंद्र व राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहे.
त्यानुषंगाने आणीबाणी काळात बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्तींनी सामाजिक व राजकीय कारणासाठी बंदिवास भोगला. त्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून यथोचित गौरव करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील आणीबाणी लढ्यातील व्यक्तींचा बुधवार, २५ जून, रोजी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाचे देखील उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी दि.२५ जूनपासून पासून एक महिना राहणार आहे. या सन्मान सोहळ्यास व चित्रप्रदर्शनास बुलढाणा जिल्हावासियांनी आणि आणीबाणी लढ्यातील व्यक्तींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000

संबंधित पोस्ट

22 एप्रिल रोजी घनसावंगी तालुक्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत..

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबईतही होणारपर्यटन सुरक्षा दलाचा शुभारंभ  – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

नविण्यामार्ग – संमिशन महाराष्ट्र : हतबल पत्रकारितेला स्वावलंबी बचा राजदीप काळे-व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य महिला शिखर अधिवेशनाची फलश्रुती राज्यनाततून अनेक पत्रकार महिलांचा सहभाग..

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे आढावा बैठकीत संबधित यंत्रणांना निर्देश

मला माझ्या प्रेक्षकांना—आणि स्वतःलाही आश्चर्यचकित करायला आवडते”: आमीर खान उपस्थितीत गाजली 56 व्या इफ्फीची शेवटची ‘फायरसाईड चॅट’

vishwatmaklokswamivarta

अनेक वर्षांपासूनच्या सुराज्य अभियानच्या मागणीला यश !खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी कायदा करणार !- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री, महाराष्ट्र राज्य