vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनाचा थकित निधी शेतक-याच्‍या खात्‍यावर जमा करून नमो शेतकरी महासन्‍मान योजना पूर्ववत चालू करा… बाबासाहेब कोलते

नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनाचा थकित निधी शेतक-याच्‍या खात्‍यावर जमा करून नमो शेतकरी महासन्‍मान योजना पूर्ववत चालू करा… बाबासाहेब कोलते

जालना (प्रतिनिधी) – राज्‍य शासनाने सुरू केलेल्‍या नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनेचा थकित निधी गेल्‍या एक वर्षापासून शेतक-याला मिळाला नसून तो तात्‍काळ शेतक-याच्‍या खात्‍यावर जमा करून नमो शेतकरी महासन्‍मान योजना पूर्ववत चालू ठेवण्‍याची मागणी स्‍वातंत्र्य सैनिक पाल्‍य युवक समितीचे प्रदेशाध्‍यक्ष बाबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्‍यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेल्‍या निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्‍हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महाराष्‍ट्रातील व भारत देशातील सर्व शेतक-यांसाठी पंतप्रधान किसान सन्‍मान योजना ही अल्‍पभूधारक शेतक-यांसाठी सुरू केली असून देशातील प्रत्‍येक शेतक-याला एका वर्षाला 6000/- रुपये म्‍हजणे प्रत्‍येकी चार महिन्‍याला रुपये 2000/- चा हप्‍ता केंद्र शासनाकडून दिला जातो. केंद्र शासनाच्‍या धर्तीवरच महाराष्‍ट्र राज्‍यातील अन्‍नदाता बळीराजाच्‍या उत्‍पन्‍न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजना तत्‍कालीन भाजपा-शिवसेना महायुतीचे मुख्‍यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सुरू केली होती. परंतु राज्‍य सरकारची ही नमो शेतकरी महा सन्‍मान योजनेचा फक्‍त एक वर्षासाठीच त्‍याचा शेतकरी बांधवांना लाभ मिळाला असून गेल्‍या एक वर्षापासून राज्‍य शासनाच्‍या नमो शेतकरी महा सन्‍मान योजनेचा निधी प्रत्‍येकी चार महिन्‍याला रुपये 2000/- म्‍हणजे वार्षिक रुपये 6000/- मिळालेला नाही.

केंद्र शासनाप्रमाणे राज्‍य शासनाने सुद्धा महाराष्‍ट्र राज्‍यातील अन्‍नदाता बळीराजाच्‍या उत्‍पन्‍न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनेचा थकित निधी तात्‍काळ शेतक-यांच्‍या खात्‍यावर जमा करावा व केंद्र सरकारप्रमाणे राज्‍य सरकाने सुद्धा नमो शेतकरी महासन्‍मान योजना पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णयगोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्रासाठी ४१४ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर,आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची तंत्र व शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ घेतली दखल

वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत आता नोंदणी न केलेला भाडेकरार आता बेकायदेशीर-ऑनलाइन नोंदणी आवश्यक….

vishwatmaklokswamivarta

महसूल विभागाची धडक कारवाई; खडकपुर्णा जलाशयात आठ बोटी केल्या नष्ट…

vishwatmaklokswamivarta

विकसित,प्रगत महाराष्ट्राचा निर्धार नवीन वर्ष राज्याच्या प्रगतीचा सुवर्णकाळ ठरो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त;अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्टपासूनची कारवाई

vishwatmaklokswamivarta