vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

गोदाकाठच्या पूरग्रस्तांना ‘समृद्धी’ने दिला माणुसकीचा हात…

गोदाकाठच्या पूरग्रस्तांना ‘समृद्धी’ने दिला माणुसकीचा हात…

राज्य प्रतिनिधी-अंबड: गोदावरी नदीला विक्रमी महापूर आला आहे. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्यात आल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे गोदाकाठच्या अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. पूरग्रस्त गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी कर्मचारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री उशिरापर्यंत मदतकार्य केले. तसेच पूरग्रस्त कुटुंबांसाठी तातडीने ‘अन्नछत्र’ सुरू करून जेवणाची व्यवस्था केली आहे.

गोदावरी नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि तातडीच्या मदतीसाठी रविवारी रात्री भाजपा नेते तथा समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी पुढाकार घेतला. कारखान्याचे कर्मचारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी गोदाकाठच्या शहागड, वाळकेश्वर, गंगा चिंचोली, गोंदी, हसनापूर ,कोठाळा, घुंगर्डे हादगाव, साष्ट पिंपळगाव ,गोरी -गंधारी या गावांतील पूरग्रस्त भागांना भेट दिली आणि मदत कार्य केले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी त्यांनी स्थानिक यंत्रणांना सहकार्य केले. तसेच, सोमवारी अन्नछत्र सुरु करून, पूरग्रस्त कुटुंबांच्या निवासाच्या ठिकाणी जाऊन समृद्धी जेवण पुरविण्याचे काम सुरु केले आहे. या माणुसकीच्या मदतीने संकटकाळात लोकांना मोठा दिलासा मिळाला आह

प्रतिक्रिया……

” जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीला विक्रमी महापूर आला आहे. नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सहकार्यातून वेळीच स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी अन्नछत्र सुरु करण्यात आले आहे. या पूरस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी समृद्धी कारखान्याचे सर्व कर्मचारी आणि भाजपचे कार्यकर्ते सज्ज आहेत.”- सतीश घाटगे( चेअरमन, समृद्धी साखर कारखाना तथा नेते, भाजप)

संबंधित पोस्ट

राज्याच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी अबूधाबी पोर्ट्स ग्रुपसोबत दोन अब्ज डॉलर्सचा सामंजस्य करार राज्याच्या सागरी उद्योग क्षेत्राची नवी भरारी

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ विरोधी प्रबोधन स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव..

सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह, विश्रामगृह येथे कंत्राटी पदभरती

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ; ग्रंथालयाचे भूमिपूजन

प्राणी जन्म नियंत्रणाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे- प्राणी जन्म नियंत्रण बाबतच्या बैठकीत सूचना

vishwatmaklokswamivarta

चैत्राच्या सोनेरी पहाटेत, आनंदाची गुढी उभारूया, नववर्षाचे स्वागत करूया! गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

vishwatmaklokswamivarta