vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह, विश्रामगृह येथे कंत्राटी पदभरती

सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह, विश्रामगृह येथे कंत्राटी पदभरती

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाअंतर्गत सैनिकी मुला मुलींचे वसतीगृह, सैनिकी विश्रामगृह, कारगिल स्मृतीवन येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीन पदभरती राबविण्यात येणार आहे. या पदांसाठी माजी सैनिक, विधवांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांची माहिती याप्रमाणे-१.सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह-सहाय्यक वसतीगृह अधीक्षक-१, सहाय्यक वसतीगृह अधीक्षिका- १, चौकीदार (पुरुष-१, महिला-१) -२, सफाई कामगार (पुरुष-१, महिला-१)-२,स्वयंपाकी(महिला)-५, माळी कामगार (पुरुष-१, महिला-१)-२,

२.सैनिकी विश्रामगृह-ĺचौकीदार(पुरुष)-१, सफाई कामगार(महिला)-१.३. कारगिल स्मृतीवन-माळी कामगार(पुरुष)-२

वरील सर्व पदांसाठी किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी अर्ज करावा. उमेदवार शारिरीक दृष्ट्या सक्षम असावा. उमेदवारांना वैयक्तिक अर्ज, आधार कार्ड, रहिवाशी दाखला, पी.पी.ओ. बॅंक पासबुक, डिस्चार्ज बुक इ. कागदपत्रांसह आपला अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा रोड, छत्रपती संभाजीनगर येथे दि.२९ जून पर्यंत जमा करावे. वरील पदांसाठी माजी सैनिकांमधून उमेदवार उपलब्ध न झाल्यास अन्य नागरिक उमेदवारांमधून पदे भरण्यात येतील, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

निरखेडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपलाज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली..

vishwatmaklokswamivarta

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावे