vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरग्रस्तांना धान्य व अन्य शिधा वस्तु वितरीत..

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरग्रस्तांना धान्य व अन्य शिधा वस्तु वितरीत..

जालना प्रतिनिधी :- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच खडकपुर्णा प्रकल्पातूनही एक लाख क्युसेसपेक्षा अधिक जलविसर्ग करण्यात आलेला आहे. तरी या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील गोदावरी काठावरील तसेच पुर्णा नदीवरील पुरग्रस्तांना धान्य व अन्य शिधा वस्तु जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानूसार वितरीत करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातील पुरामुळे बाधित झालेल्या आपेगाव, साष्ट पिंपळगाव, सुखापुरी, पिठोरी सिरसगाव, जोगलादेवी, वाणेगाव, आंतरवाली टेंभी या गावातील नागरिकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधा वस्तुंचे वितरण जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांच्या नियंत्रणाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांच्याकडून करण्यात आली आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात3 हजार 953 उपक्रम राबविल्याची प्रथमच नोंदअप आधारित महाकृषी खरीप मोहिम यशस्वी..

लोककल्याणकारी कामांतून जनतेचे प्रश्न सोडवा- पालकमंत्री शंभूराज देसाई

स्टॉप डायरिया’ मोहीम प्रभावीपणे राबवा- अपर जिल्हाधिकारी अडकूणे

जारीदासह परिसरातील ५० गावांसाठी खात्रिशीर विजेची सोय झाल्याने मेळघाटातील आदीवासी बांधव आणि महावितरणकडून मा. सरन्यायाधिश भुषण गवई यांचे आभार

vishwatmaklokswamivarta

पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत कार्यक्रमात प्रतिपादन- जलसाक्षरता, पाणीबचत, पुनर्वापरासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातून दिशा…

इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश,मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती करुन तातडीची उपाययोजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय…