vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य व ब्लेन्केट वाटप

श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य व ब्लेन्केट वाटप

 राज्य प्रतिनिधी- कल्याणच्या श्रीराम कृष्ण सेवा ट्रस्ट तर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजूं या योजनेचा लाभ घेत असतात महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते आधारवाडी च्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात.

 गुरूवार दि.२०/११/ २०२५, रोजी सकाळी ११.३० वाजता झालेल्या या उपक्रमात माजी नगरसेवक श्रेयस समेळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून त्यांच्या हस्ते गरजु लोकांना अन्नधान्य व ब्लेन्केट वितरण करण्यात आले ह्या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री जसूभाई चंदाराणा, विनुभाई तन्ना, छबीलभाई कारिया, मितुलभाई देसाई, विष्णूकुमार चौधरी, भिखूभाई कारीया, राजूभाई विठलानी,राजीव चंदाराणा, तुषारभाई दाणी, रवी चौधरी, दयालभाई सजनानी,नटुभाई खिमानी, वंश चंदाराणा, मोनिश चंदाराणा आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य सह ब्लेन्केट वितरण करण्यात आले. ह्या प्रसंगी मधुरीमा स्वीटवाले जिगीशभाई बारोट ह्यांनी वितरण साठी ब्लेन्केट दिल्या बदल त्यांचे खास आभार मानले.

ह्या ट्रस्ट चे संचालक ह्यांनी आव्हान केले आहे की ज्या कोणाला ह्या अन्न क्षेत्राचे सेवा कार्या मध्ये सहयोग करायचे असेल तर आपल्या वाढदिवसाच्या किंवा आपल्या पितृच्या पूण्यतिथी आणी घराचे चांगले प्रसंगी ह्या ट्रस्टला दान देवून आपण सहकार्य करावे. ह्या साठीसंचालक-श्री. जसुभाई चऺदाराणा-(मो.9320301501), श्री.छबीलभाई कारीया – (मो.9322403819) ह्यांना संपर्क करावा

000000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एमपीएससीत,मुलींमध्ये राज्यात अव्वल आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे हिचा सत्कार

शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला सवलतीच्या प्रस्तावांना वाढीव मुदत· 31 जानेवारी अंतीम मुदत

मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी विश्वपदयात्रा ; जालना शहरात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या- थेट कर्ज योजनेसाठी 30 मार्च रोजी लॉटरीने निवड

कोणत्याही मदतीची गरज असल्यास, आवश्यक ती मदत पोहोचवली जाईल! पालकमंत्री मंगल प्रभात लोढा