vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सकारात्मक ऊर्जेला अधिक प्रवाहित   — जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर-श्री गुरु तेग बहादुर साहिबजी समागम कार्यक्रमाच्या प्रसारासाठी-जिल्ह्यातील सोशल मीडिया इंफ्लुएंसर यांना आवाहन

सकारात्मक ऊर्जेला अधिक प्रवाहित   –– जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर-श्री गुरु तेग बहादुर साहिबजी समागम कार्यक्रमाच्या प्रसारासाठी-जिल्ह्यातील सोशल मीडिया इंफ्लुएंसर यांना आवाहन

नागपूर, प्रतिनिधी: हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम समारोहाचे भव्य प्रमाणात प्रथमच आयोजन होत आहे. सुमारे 5 लाख भाविक या निमित्ताने विदर्भातील सर्व जिल्ह्यातून येत आहेत. या समारोहाच्या व्यवस्थापनासाठी 25 पेक्षा अधिक विविध समित्या, विविध शासकीय विभाग प्रमुख अहोरात्र काम करीत आहेत. शीख समाजासह इतर समाजाचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. सर्वांच्या योगदानातून नवा इतिहास निर्माण करु पाहणाऱ्या या कार्यक्रमाच्या सकारात्मक उर्जेला अधिकाधिक प्रवाहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

कोणत्याही मोठ्या आयोजनात वेळेवर काही कमतरता उद्भवतात. यावर तात्काळ मात करता यावी यासाठी सर्व समित्यांना निर्देश दिलेले आहेत. याचबरोबर हा समारोह स्वंयशिस्तीचा, आपल्या सेवातत्परतेचा म्हणून पाहिला जात आहे. येथील प्रत्येक सहभागी हा त्याच जबाबदारीने सहभागी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूर मधील हा भव्य कार्यक्रम नवा आयाम निर्माण करणारा असेल. शासन, शीख व इतर धर्मीय समाज यांच्याबरोबर सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर अधिक जबाबदारीने आपल्या वार्तांकन व चित्रीकरणाबाबत काळजी घेईल, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या या भव्य समागम कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

0000

संबंधित पोस्ट

वेबसाईट बंद असल्याने नवीन, जुने रेशनकार्ड मिळत नसल्याने-काँग्रेस माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांना एका निवादानाद्वारे सुरू करण्याची मागणी केली आहे.

महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांद्वारे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – रुपाली चाकणकर जनसुनावणीत महिलांच्या ६८ तक्रारींवर कार्यवाही

vishwatmaklokswamivarta

मुंबईत उपनगरासह रिमझिम पाऊस सुरू झाला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबाग तालुक्यातील मतदान,मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला दिली भेट*

vishwatmaklokswamivarta

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद नियम क्रमांक २६० अन्वये चर्चेवर उत्तर-छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी ३४.२८ कोटींचा निधी; औषधांचा तुटवडा नाही· मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेत माहिती