vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्या

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर क

लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर …

नवी दिल्ली प्रतिनिधी-लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘जी राम जी’ म्हणजेच विकसित भारत – रोजगार आणि उपजीविकेची हमी अभियान (ग्रामीण) हे महत्त्वाचं विधेयक सादर केलं. हे विधेयक २० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे.

नव्या विधेयकाचा मुख्य उद्देश चार प्राधान्य क्षेत्रांद्वारे रोजगार निर्मिती आणि शाश्वत ग्रामीण पायाभूत सुविधा उभारणं हा आहे. या अंतर्गत पाणी सुरक्षा, ग्रामीण मूलभूत सुविधा, उपजीविकेशी संबंधित कामं आणि हवामान बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी विशेष कामांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आता १०० ऐवजी १२५ दिवसांच्या कामाची हमी देण्यात येणार असून, अधिक वेतन, संरक्षण आणि पारदर्शक अंमलबजावणी यंत्रणा उपलब्ध होणार आहे.

या विधेयकामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून विकसित भारताच्या संकल्पनेला बळ मिळेल, असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे.

संबंधित पोस्ट

आषाढी एकादशी निमित्त राज्यपालांची श्री शृंगेरी शंकर मठाला भेटपंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा असल्याचे राज्यपालांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांनी केले महामानवाला अभिवादन

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावनापॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे स्वागत-संघटित गुन्हेगारी, ड्रग माफियांचे संकट दूर करण्यासाठी पॅराग्वेला सहकार्याची अपेक्षा..

उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर खाजगी क्लासेससाठी आदेश निर्गमित सकाळ-सायंकाळच्या सत्रात किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून क्लासेस घ्यावेत..

पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन

11वा आंतरराष्ट्रीय योग दिन दि.21 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार साजरा

vishwatmaklokswamivarta